देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे महिलांच्या आरोग्यवर निगेटिव्ह परिणाम, अभ्यासातून समोर आली माहिती
(Photo Credits: Pixabay)

भारतात 2020 मध्ये कोविड19 मुळे सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला. यामुळे महिलांच्या आरोग्यावर निगेटिव्ह परिणाम झाल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. इकोनोमिया पॉलिटिका जर्नल पत्रिकेत छापण्यात आलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जरी खाद्यपदार्थांच्या गोष्टींसंदर्भात सूट दिली असली तरीही महिलांच्या खाद्यपदार्थांमध्ये 2019 च्या तुलनेत अधिक घट झाली.(Coronavirus: कोरोनावरील लस इंजेक्शन ऐवजी आता नागरिकांना मिळण्याची शक्यता)

नवी दिल्लीच्या कृषी आणि पोषणसाठी टाटा कोर्नेल संस्थेला असे कळले की ही घट मांस, अंडी, भाजी आणि फळ यांच्यासारख्या खाद्यपदार्थांच्या वापरामध्ये घट झाली असून ते सुक्ष्म पोषक तत्वयुक्त असतात. ही तत्व आरोग्याच्या विकासासाठी फार आवश्यक असतात. अभ्यासाच्या सह-लेखक टीसीआयमध्ये शोध अर्थशास्री सौम्या गुप्ता यांनी म्हटले की, महिलांच्या आहारामध्ये जागातिक महारोगापूर्वी सुद्धा विविध खाद्यामध्ये कमतरता होती पण कोविडच्या काळात ती अधिकच खराब झाली.

त्यांनी पुढे असे म्हटले की, पोषणा संबंधित परिणामांवर जागतिक महारोगाचा प्रभाव दिसून येणारी नितीला लैंगिक पहलूच्या दृष्टीने पहावे लागणार आहे. जे महिलांच्या द्वारे दिसून येणारा थकवा दर्शवते. त्याचसोबत लॉकडाउनच्या दरम्यान अंगणवाडी केंद्र बंद असल्याने महिलांवर सुद्धा त्याचा अधिक बोझा पडला आहे.(COVID-19 Vaccine Update: Sputnik V च्या निर्मितीमध्ये आता Serum Institute of India देखील सहभागी; सप्टेंबर महिन्यापासून होणार सुरूवात)

सर्वेक्षणात सहभागी करण्यात आलेल्या 155 तासांच्या आकडेवारीनुसार जागतिक महारोगाच्या दरम्यान 72 टक्के घरांमध्ये अंगणवाडीच्या सेवा पोहचवल्या जातात. त्याचसोबत शेती पुरवठ्यात सुद्धा चढउतार पहायला मिळाला. खासकरुन त्याच्या किंमतीमध्ये याचा परिणाम दिसून आला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 90 टक्के लोकांनी कमी खात असल्याची महिती दिली. तर 95 टक्क्यांनी म्हटले की, त्यांनी कमी प्रकारच्या भोजनाचे सेवन केले.