Tripura: त्रिपुरातील घटनांबाबत सोशल मीडियावरून पसरवल्या खोट्या बातम्या; कोणत्याही मशिदीचे नुकसान झाले नाही, गृह मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चांनंतर महाराष्ट्राच्या काही भागात हिंसाचार उसळला आहे. अमरावतीमध्ये, त्रिपुरातील अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबवावेत या मागणीसाठी शुक्रवारी 8,000 हून अधिक लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक निवेदन सादर केले