Rohit Sharma And Virat Kohli (Photo Credit - X)

India vs Bangladesh: टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ही मालिका ऑगस्टपर्यंत खेळवली जाईल. तर या मालिकेनंतर टीम इंडियाला बांगलादेश दौऱ्यावर जावे लागले. या दौऱ्यात टीम इंडियाला एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची होती, तर एकदिवसीय मालिकेत, बऱ्याच काळानंतर चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडीही खेळताना दिसली असती. आता बांगलादेश दौऱ्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे रोहित आणि विराटच्या (Rohit-Kohli) चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

IND vs PAK: पाकिस्तान संघाला भारताचा 'ग्रीन सिग्नल', गृह मंत्रालयाची 2 मोठ्या स्पर्धांसाठी भारतात खेळण्यास परवानगी!

टीम इंडियाचा बांगलादेश दौरा रद्द

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, ऑगस्टमध्ये टीम इंडियाचा बांगलादेश दौरा आता रद्द करण्यात आला आहे. तथापि, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "बांगलादेशचे भारतासोबत मालिकेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, एका आठवड्यात यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. क्रिकबझशी बोलताना एका प्रसारकाने सांगितले की, " बांगलादेशची भारतासोबत कोणतीही मालिका नाही."

आयपीएल 2025 दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आशा होती की रोहित-विराटची जोडी बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसेल, परंतु आता चाहत्यांना जास्त वाट पहावी लागू शकते.