मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) अखेर आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री आणि आरपीआय (A) गटाचे नेते रामदास आठवले यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली असून, त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय पक्षाने माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांसारख्या अनुभवी नेत्यांनाही मैदानात उतरवले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)