Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले शासक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. सईबाईंच्या मृत्युनंतर त्यांचे संगोपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी केले.
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (Sambhaji Maharaj Jayanti 2025) 14 मे राजी साजरी करण्यात येणार आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोंसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले शासक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. सईबाईंच्या मृत्युनंतर त्यांचे संगोपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी केले. एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, मराठा दरबारातील काही मंत्र्यांनी संभाजींचे सावत्र भाऊ राजाराम यांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्याचे प्रयत्न केले. राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या पत्नी सोयराबाईपासून झालेले दुसरे पुत्र होते.
सिंहासनावर आल्यानंतर, संभाजींनी शेजारच्या विविध राज्यांविरुद्ध लष्करी मोहिमा सुरू केल्या. बुरहानपूरवरील हल्ल्यापासून मुघलांशी वारंवार संघर्ष होत होते. संभाजींचे जंजीराच्या सिद्दी आणि गोव्यातील पोर्तुगीजांशीही लढाई केली. 1684 मध्ये इंग्रजी शस्त्रे आणि गनपावडरची गरज ओळखून त्यांनी इंग्रजांशी तह केला. तथापि, 1687 मध्ये, मराठा आणि मुघल सैन्यामध्ये वाईची लढाई झाली. ही लढाई वाई आणि महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात लढली गेली. युद्धात मुघलांचा पराभव झाला असला तरी, मराठ्यांनी त्यांचा सेनापती हंबीराव मोहिते गमावला, जो त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता. यामुळे संभाजी राजांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
फेब्रुवारी 1689 मध्ये, संभाजींना त्यांच्या 25 सल्लागारांसह संगमेश्वर येथे पकडण्यात आले. त्यांचे जवळचे मित्र कवी कलश देखील यावेळी त्यांच्यासोबत पकडे गेले. संभाजी आणि कलश यांना मुघलांनी अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे नेले. दोघांनाही फाशी देण्यापूर्वी अपमानित आणि क्रूर छळ करण्यात आला. 11 मार्च 1689 रोजी तुलापूर येथे शिरच्छेद करून संभाजींना फाशी देण्यात आली.
संभाजींच्या मृत्युनंतर, राजाराम भोसले सिंहासनावर विराजमान झाले. संभाजी हे मराठी आणि इतर काही भाषांचे विद्वान होते. त्यांनी बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हे काव्यलेखन राजकारणावर आहे. ज्यात त्यांनी लष्करी रणनीती आणि राज्यकर्त्यांसाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल चर्चा केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

