अहिल्याबाईंनी सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सुनबाईवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार अहिल्याबाईंवरच सोपवत असत. अहिल्याबाई होळकर या स्वभावाने स्वाभीमानी आणि शूर होत्या. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या आणि स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने प्रजेची मने जिंकली. १३ ऑगस्ट १७९५ रोजी अहिल्या बाई होळकर यांचे निधन झाले होते.