IPL 2020 Final: रोहित शर्मा बनला आयपीएलचा 'किंग', CSKच्या या विक्रमाची केली बरोबर; पाहा फायनलमध्ये बनलेले 'हे' रेकॉर्ड
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलमध्ये (IPL) आपले वर्चस्व कायम ठेवले आणि विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या अंतिम (IPL Final) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिले फलंदाजी केली आणि 156 धावांपर्यंत मजल मारली. ज्याच्या प्रत्युत्तरात गतविजेत्या मुंबईने कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सर्वाधिक 68 धावांच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवला. अंतिम क्षणी दिल्लीच्या गोलंदाजांनी संघाला सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण तोवर फार उशीर झाला होता. या विजयसह मुंबईने आपल्या विषम वर्षी विजेतेपद जिंकण्याचा रेकॉर्ड मोडला आणि 2020 मध्ये किताब जिंकला. मुंबईने यापूर्वी, 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये विजेतेपद जिंकले आहे. आजच्या सामन्यातील विजयात कर्णधार रोहितने पुढाकार नेतृत्व केले असून सर्व खेळाडूंनी त्याला चांगली साथ दिली आणि आपले सर्वश्रेष्ठ खेळ केला. (MI vs DC, IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सचा विक्रमी 'पंच'! रोहित शर्माचा हिटमॅन अवतार, दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेटने पराभव करून जिंकली आयपीएलची फायनल जंग)

आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स, रोहित शर्मासह अन्य खेळाडूंनी काही विक्रमांना गवसणी घातली आहे जे इथे आपण पाहणार आहोत.

1. आयपीएल फायनलचा आजचा सामना रोहितचा आयपीएलमधील 200वा सामना होता. रोहित वगळता फक्त चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएलमध्ये 200 सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे.

2. रोहितने आजच्या सामन्यात तुफान बॅटिंग केली. रोहितने सामन्यात 8 धावा करताच मुंबईसाठी 4000 धावांचा टप्पा गाठला पहिला फलंदाज ठरला.

3. रोहित टी-20 लीगमधील सर्वात नामांकित कर्णधार म्हणून कायम आहे आणि आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 43 3000 धावांपर्यंत जाण्यासाठी त्यांना फक्त धावांची आवश्यकता आहे.

4. रोहित टी-20 लीगमधील सर्वात नामांकित कर्णधार आहे आणि त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले. रोहितने आजच्या सामन्यात अर्धशतक करण्यापूर्वी 43 धावा करताच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 3000 धावांचा टप्पा गाठला.

5. आयपीएलमध्ये आपल्या विजेटपदाचा बचाव करणारा मुंबई इंडियन्स फक्त दुसरा संघ ठरला. यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्सने 2010 मध्ये पहिले आयपीएल चॅम्पियनशिप जिंकले असून 2011 मध्ये आपले विजेतेपद कायम ठेवले होते.

6. मुंबई इंडियन्सच्या आजच्या विजयासह रोहित स्पर्धेचा किंग-मेकर ठरला. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने विक्रमी पाचवे विजेतेपद जिंकले असून त्याचे हे सहावे विजेतेपद ठरले. यापूर्वी रोहितने एक खेळाडू म्हणून 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना आयपीएलचा 'किताब जिंकला होता. इतकंच नाही तर रोहितने 6 आयपीएल सामने खेळले असून त्याने सर्वांमध्ये विजय मिळवला आहे.

7. आयपीएलच्या एका सत्रात 3 गोलंदाजांनी 25 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. कगिसो रबाडाने 30, जसप्रीत बुमराहने 27 आणि ट्रेंट बोल्टने 25 विकेट घेतल्या आहेत.

8. दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज शिखर धवन आयपीएल मध्ये तीन वेगवेगळ्या संघांसाठी आयपीएल फायनल खेळणारा फक्त तिसरा खेळाडू ठरला. धवन मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल फायनलमध्ये झळकला.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता, पण त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली ज्याचा फटका त्यानं बसला आणि त्यांचे पहिले विजेतेपद पटकावण्याची स्वप्न हुकले.