Corona Virus Update: लसीमुळे कोरोना मृत्यूची संख्या झाली कमी, आयसीएमआरने केला दावा
Corona Vaccines | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी गुरुवारी सांगितले की, लस (Vaccine) ही रोग सुधारण्यासाठी आहे. तसेच तो रोखू शकत नाही. म्हणून लसीकरण (Vaccination) करण्यात येत आहे. या नंतरही मास्क (Mask) वापरणे अत्यंत महत्वाचे आहे. भार्गव देशातील कोविड -19 (Covid 19) च्या परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) पत्रकार परिषदेत बोलत होते. भार्गव म्हणाले, लस रोगाची तीव्रता, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी करतात आणि मृत्यू 98-99 टक्क्यांनी कमी करतात. पूर्ण लसीकरण गंभीर आजार आणि मृत्यूपासून संरक्षण प्रदान करते. तसेच गर्दी उपस्थित असताना स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक असते. आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) म्हणाले की भारत अजूनही दुसऱ्या कोविड लाटेच्या पकडीत आहे.

भूषण म्हणाले की, गेल्या 24 तासांत भारतात 46,000 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 58 टक्के केवळ केरळमधून आले आहेत. भारताने आपल्या दैनंदिन कोविड मार्गात खालच्या दिशेने कल दर्शविला आहे. यावर जोर देताना भूषण म्हणाले की देशात सुमारे 3.33 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. तर पुनर्प्राप्ती दर 97 टक्क्यांहून अधिक आहे. ते म्हणाले की भारताचा साप्ताहिक सकारात्मकता दर सलग आठ आठवड्यांसाठी 3 टक्क्यांच्या खाली राहिला आहे. हेही वाचा Byculla St. Joseph's Orphanage: मुंबईत अनाथालयातील 22 जणांना कोरोनाची लागण, संक्रमित बाधितांमध्ये लहान मुलींचाही समावेश

आपण अजूनही आपल्या देशात कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत आहोत. दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. ती संपलेली नाही आणि म्हणून आपल्याला सर्व आवश्यक खबरदारी ठेवावी लागेल, विशेषत: आता सणांचे दिवस सुरू होत आहे. या दिवसांत विशेष खबरदारी घेतली पाहिजे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे येणारे महिने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण आपण काही सण साजरे करणार आहोत. अशा प्रकारे सण कोविड-योग्य वर्तनासह साजरे केले पाहिजेत. असे राजेश भूषण म्हणाले आहेत.

मात्र एकूण 41 जिल्हे सध्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक सकारात्मकतेचा अहवाल देत आहेत. ते म्हणाले की 31 राज्यांमध्ये 10,000 पेक्षा कमी सक्रिय कोविड प्रकरणे आहेत, चार राज्यांमध्ये 10,000 ते 1 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. तर केरळमध्ये एक लाखांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. सध्या भारतातील सक्रिय प्रकरणांपैकी 51 टक्के केरळमध्ये आहेत, त्यानंतर महाराष्ट्र 16 टक्के आहे.