Pakistan Floods and Food Crisis: पूर आणि अन्न संकटामुळे पाकिस्तान त्रस्त; लवकरच सुरु करू शकतो भारतासोबत व्यापार

यापूर्वी लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनीही सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते, असे सांगितले होते. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

Pakistan Floods and Food Crisis: पूर आणि अन्न संकटामुळे पाकिस्तान त्रस्त; लवकरच सुरु करू शकतो भारतासोबत व्यापार
India-Pakistan Partition | Archived, edited, symbolic images)

पूर आणि अन्न संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार (Trade) सुरू करणार आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल (Finance Minister Miftah Ismail) यांनी ही घोषणा केली आहे. मिफ्ता इस्माईल म्हणाल्या, ‘देशातील पूर आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आम्ही भारतासोबत व्यापार मार्ग पुन्हा सुरु करू.’ इस्माईल यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितले की, नुकत्याच आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी सरकार भारतातून भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ आयात करण्याचा विचार करू शकते.

रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषद घेत असताना एका प्रश्नाच्या उत्तरात मिफ्ता इस्माईल यांनी हे उत्तर दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ भारतासोबतच्या व्यापाराबाबत काही प्रस्तावांवर काम करत होते. त्याचवेळी, पाकिस्तानचे माजी वाणिज्य सल्लागार रझाक दाऊद यांनीही अनेक प्रसंगी भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याची वकिली केली आहे.

मार्च 2021 मध्ये, पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने सांगितले की, ते देशाच्या खाजगी क्षेत्राला वाघा सीमेवरून भारतातून 0.5 दशलक्ष टन पांढरी साखर आणि कापूस आयात करण्यास परवानगी देईल. मात्र, काही दिवसांतच हा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णयाला पीएमएलएन आणि पीपीपीने विरोध केला होता, जे सध्या पाकिस्तानमध्ये आघाडी सरकार चालवत आहेत.

सध्या पाकिस्तानातील भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. लाहोरच्या बाजारात कांदा 500 रुपये किलो आणि टोमॅटो 400 रुपये किलोने विकला जात आहे. बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाबमधील भाज्यांच्या पुरवठ्याला पुरामुळे मोठा फटका बसल्याने आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या अफगाणिस्तानातून लाहोर आणि पंजाब या शहरांमध्ये कांदा आणि टोमॅटोचा पुरवठा केला जात आहे.

यापूर्वी लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनीही सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते, असे सांगितले होते. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार कमी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या निर्णयानंतर, पाकिस्तानने ऑगस्ट 2019 मध्ये भारतासोबतचे व्यापारी संबंध लक्षणीयरीत्या कमी केले. (हेही वाचा: पाकिस्तानात पाऊस आणि पुरामुळे हाहाकार, जवळजवळ 1000 जणांचा मृत्यू; देशात आणीबाणी जाहीर)

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानातील पूरस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे झालेला विध्वंस पाहून वाईट वाटले, असे ट्विट त्यांनी केले. आम्ही पीडित, जखमी आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त आणि लवकरात लवकर सामान्य स्थिती पूर्ववत होण्याची अपेक्षा करतो, असे ते म्हणाले.

(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2022 10:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).