मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, २८ ऑक्टोबर रोजी मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. IMD ने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे जिल्ह्यांसाठी बुधवार, २९ ऑक्टोबर पर्यंत, तर पालघर जिल्ह्यासाठी ३० ऑक्टोबर पर्यंत 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे. चक्रीवादळ 'मोंथा' च्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील हालचाली वाढल्या असून, किनारपट्टीच्या भागात हवामानातील बदल दिसून येत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)