IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरूद्ध बेंगळुरू वनडे सामन्यात टीम इंडियाने घातले ब्लॅक बँड, जाणून घ्या कारण
बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. माजी भारतीय अष्टपैलू बापू नाडकर्णी यांचे शुक्रवारी 17 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय संघाचे सर्व खेळाडू आज काळ्या पट्टीला बांधून मैदानात उतरले आहेत.
यजमान भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Bengaluru) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. कर्णधार विराट कोहली याच्यासह संघातील सर्व सदस्यांची भारतीय संघातील माजी दिग्गज व्यक्तीच्या सन्मानार्थ काळी पट्टी आहे. माजी भारतीय अष्टपैलू बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni) यांचे शुक्रवारी 17 जानेवारी रोजी निधन झाले. भारतीय संघासाठी जवळपास 13 वर्षे कसोटी क्रिकेट खेळणार्या नाडकर्णी यांनी वयाच्या 86 व्या वर्षी या जगाला निरोप दिला. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय संघाचे सर्व खेळाडू आज काळ्या पट्टीला बांधून मैदानात उतरले आहेत. सामन्याआधीच बीसीसीआयने घोषणा केली होती की खेळाडू ब्लॅक बँडसह सामन्यात प्रवेश करतील. (भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत निधन, टेस्टमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याच्या विश्वविक्रमाची केली आहे नोंद)
1955 मध्ये नाडकर्णीने भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि 21 षटकांत प्रथम फेकण्याचा विश्वविक्रम केला. त्यानंतर त्यांनी 1968 पर्यंत टीम इंडियाकडून एकूण 41 कसोटी सामने खेळले, ज्यात बापू नाडकर्णी यांनी 65 डावात 88 गडी बाद केले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या कारकीर्दीची इकॉनॉमी रेट प्रति षटकात 1.7 धावा आहे. दुसरीकडे, फलंदाज म्हणून नाडकर्णी यांनी 1414 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
बेंगळुरूमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजकोट सामन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये के बदल झाला आहे. केन रिचर्डसनला डच्चू देत जोश हेझलवूडला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झाला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला, तर भारताने राजकोट सामना जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली असल्याने मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ आज मैदानात उतरले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2020 02:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

