Team India New Record T20I: झिम्बाब्वेला पराभूत करून टीम इंडियाने रचला एक अनोखा विक्रम, आजपर्यंत कोणीही करू शकले नाही हे काम

IND vs ZIM: भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना गमावला असला तरी त्यानंतर सलग दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आणि मालिकेत बरोबरीच केली नाही तर आघाडीही घेतली आहे. दरम्यान, या मालिकेत दोन सामने बाकी आहेत, मात्र त्याआधी भारतीय क्रिकेट संघाने एक नवा विक्रम रचला आहे.

Team India New Record T20I: झिम्बाब्वेला पराभूत करून टीम इंडियाने रचला एक अनोखा विक्रम, आजपर्यंत कोणीही करू शकले नाही हे काम
Team India (Photo Credit - X)

IND vs ZIM T20 Series: टीम इंडिया (Team India) सध्या शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. जिथे 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना गमावला असला तरी त्यानंतर सलग दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आणि मालिकेत बरोबरीच केली नाही तर आघाडीही घेतली आहे. दरम्यान, या मालिकेत दोन सामने बाकी आहेत, मात्र त्याआधी भारतीय क्रिकेट संघाने एक नवा विक्रम रचला आहे. जे आजपर्यंत जगातील इतर कोणत्याही संघाला करता आलेले नाही. मात्र, पाकिस्तान संघ या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. (हे देखील वाचा: IND vs ZIM 4th T20I: झिम्बाब्वेमध्ये टी-20 मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर भारत, चौथ्या सामन्यात करावी लागणार 'ही' कामगिरी)

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 150 सामने जिंकणारा पहिला संघ

भारतीय क्रिकेट संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला संघ बनला आहे, ज्याने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 150 सामने जिंकले आहेत. याआधीही टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर होती, पण आता नवा टप्पा गाठला आहे, जो यापूर्वी कधीही घडला नव्हता. पाकिस्तान संघ आतापर्यंत 142 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, खेळल्या गेलेल्या सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने पाकिस्तानपेक्षा कमी सामने खेळले आहेत.

टीम इंडियाने 2006 मध्ये पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता

भारताने 2006 मध्ये पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हा वीरेंद्र सेहवाग भारतीय संघाचा कर्णधार होता आणि हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेला होता, जो जिंकण्यातही टीम इंडिया यशस्वी ठरली होती. तेव्हापासून भारताने 230 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 150 जिंकले आहेत. भारतीय संघ 69 सामने हरला असून 6 सामन्यांचा निकाल लागला नाही. आणि 5 सामने बरोबरीत संपले. या 150 विजयांमध्ये भारताने सुपर ओव्हर किंवा बॉल आउटमध्ये जिंकलेल्या विजयांचा समावेश नाही.

 

(The above story first appeared on LatestLY on Jul 12, 2024 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).