Mumbai to Turkey Flights: 'मुंबई ते तुर्की विमानसेवा कोणत्याही परिस्थितीत सुरू करू नये'; Shiv Sena पक्षाची मागणी

कनाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या पत्रांमध्ये तुर्कीने दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला विरोध करत, पाकिस्तानला समर्थन दिल्याबद्दल गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

Mumbai to Turkey Flights: 'मुंबई ते तुर्की विमानसेवा कोणत्याही परिस्थितीत सुरू करू नये'; Shiv Sena पक्षाची मागणी
Rahool N Kanal

शिवसेनेने (शिंदे गट) तुर्कीने (Turkey) पाकिस्तानला (Pakistan) दिलेल्या समर्थनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई ते इस्तंबूल उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि सोशल मीडिया प्रमुख राहुल कनाल (Raho) यांनी ही मागणी जोरदारपणे मांडली असून, ‘भारताच्या शत्रू राष्ट्रांना उघडपणे समर्थन देणाऱ्या देशांशी कोणतेही संबंध ठेवता कामा नये. मुंबई ते तुर्की उड्डाणे कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवता येणार नाहीत,’ असे ठाम मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती युतीचा भाग असलेल्या शिवसेना पक्षाने, भारतीय विमान कंपन्यांना मुंबईहून तुर्कीला विमान सेवा देऊ नये असे आवाहन केले आहे, कारण यामुळे देशाला मिळणारा पर्यटन महसूल ‘भारताविरुद्ध वापरला जात आहे’, असा दावा केला आहे.

कनाल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या पत्रांमध्ये तुर्कीने दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला विरोध करत, पाकिस्तानला समर्थन दिल्याबद्दल गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेल्या परिस्थितीत तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे समर्थन दिल्याने, भारतातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.

तुर्कीने भारताविरोधातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याने, भारताने तुर्कीशी आपले संबंध पुन्हा तपासण्याची गरज असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी मुंबई ते इस्तंबूल उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी विशेषतः 29 मे 2025 रोजी तुर्की एअरलाइन्सच्या तीन आणि इंडिगोच्या एका उड्डाणाचा उल्लेख करत, या उड्डाणांना तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. कनाल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘या उड्डाणांवर बंदी घालणे हे तुर्कीच्या कृतींना योग्य प्रत्युत्तर ठरेल आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाबाबत आपली बांधिलकी दर्शवेल.’

राहुल कनाल यांनी केवळ उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणीच केली नाही, तर तुर्कीविरुद्ध व्यापक कृतींची शिफारसही केली आहे. यामध्ये राजनैतिक कारवाई म्हणजेच तुर्कीसोबतचे राजनैतिक संबंध तात्काळ स्थगित करणे, देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक मर्यादित करून आर्थिक निर्बंध घालणे, तुर्कीच्या कृतींविरुद्ध जागतिक सहमती निर्माण करण्यासाठी आणि पर्यटन बंदी लादण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मुद्दे उपस्थित करणे, या बाबींचा समावेश होता. कनाल यांच्या मते, तुर्कीमध्ये येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी भारताचा वाटा 30 टक्के आहे. 2024 मध्ये 3 लाखांहून अधिक लोकांनी या देशाला भेट दिली.

पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी असा दावा केला आहे की, पर्यटन उद्योगात मुंबईचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारत हा तुर्कीचा सर्वात मोठा पर्यटक आणि तिथे खर्च करणारा देश आहे. तुर्कीमध्ये येणाऱ्या आणि खर्च करणाऱ्यांमध्ये भारतीयांचा समावेश आहे. मात्र जोपर्यंत तुर्की भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानला पाठिंबा देत आहे, तोपर्यंत मी सरकारला मुंबई ते तुर्की सर्व विमान सेवांवर बंदी घालण्याचा विचार करण्याची विनंती करतो.  तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याच्या कथित आरोपानंतर, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तुर्की फर्मची सुरक्षा मंजुरी रद्द केली. सेलेबीने या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).