Biggest Sex Scandal: देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलवर जुलैमध्ये येणार 'Ajmer 1992' चित्रपट; 250 मुलींवर बलात्कार करून केले होते ब्लॅकमेल
Ajmer 1992 (संग्रहित संपादित प्रतिमा)

अजमेरमधील (Ajmer) 90 च्या दशकातील सेक्स आणि ब्लॅकमेलिंग स्कँडलवर आधारित 'अजमेर 92' (Ajmer 1992) हा चित्रपट या वर्षी जुलैमध्ये रिलीज होणार आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटने ही घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना सांगितले की, ‘अजमेर 92’ यावर्षी 14 जुलै रोजी येणार आहे. पोस्टरमध्ये 28 कुटुंबे बेपत्ता झाल्याची बातमी, हत्येचा उल्लेख, 250 महाविद्यालयीन तरुणींच्या नग्न फोटोंचे वितरण हे ठळक मुद्दे दिसत आहेत. या चित्रपटात करण वर्मा, सुमित सिंग, सयाजी शिंदे आणि मनोज जोशी दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंग यांनी केले आहे आणि त्याचे निर्माते उमेश कुमार आहेत.

अजमेर 92 हा चित्रपट ‘अजमेर दर्गाहच्या चिश्तीच्या सेक्स स्कँडल 1992' वर आधारित आहे. हा असा मुद्दा होता, ज्याला ना सरकारने गांभीर्याने घेतला, ना प्रसारमाध्यमांना त्याच्याबाबत बोलण्याची हिंमत दाखवली. मुस्लिम धर्मांधांनी शेकडो हिंदू मुलींचे लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांचे एमएमएस बनवले होते. अजमेर दर्ग्याचा खादिम फारुख चिश्ती 100 मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. मात्र अजमेर बलात्कार प्रकरणात जवळजवळ 300 मुलींना बळी बनवण्यात आल्याचे काही लोकांचे मत आहे. हे प्रकरण 'भारतातील सर्वात मोठे बलात्कार प्रकरण' आणि अजमेर दर्गा घटना '1992' म्हणून ओळखले जाते.

या चित्रपटाचे शूटिंग दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. त्यावेळी या चित्रपटात तथ्यांशी छेडछाड केल्यास आंदोलन करू, असा इशारा हिंदू संघटनांनी दिला होता. अजमेरचे हे सेक्स आणि ब्लॅकमेलिंग प्रकरण एप्रिल 1992 मध्ये उघडकीस आले होते. संतोष कुमार या पत्रकाराने ते जगासमोर आणले. या बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग स्कँडलच्या बळी बहुतेक शाळा आणि महाविद्यालयीन मुली होत्या. यापैकी बहुतेकांनी आत्महत्या केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: The Diary of West Bengal चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगाल पोलिसांची नोटीस, राज्याची बदनामी केल्याचा आरोप)

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अजमेर अनेक दिवस बंद होते. लोक रस्त्यावर उतरले होते आणि निदर्शने सुरू झाली होती. यातील बहुतेक आरोपी एका विशिष्ट समुदायाचे होते आणि पीडित सामान्यतः हिंदू होते. या प्रकरणात 18 जणांना आरोपी ठरवण्यात आले होते. त्यांच्यामध्ये फारुख चिश्ती या काँग्रेस नेत्याचेही नाव होते. या प्रकरणात 200 हून अधिक पीडित होते, परंतु काहींनीच निवेदन दिले होते. खेदाची गोष्ट म्हणजे, त्यापैकी क्वचितच कोणीतरी त्यांच्या विधानावर ठाम राहिले.

त्या वेळी अजमेरमध्ये 350 हून अधिक वर्तमानपत्रे आणि मासिके होती, मात्र या सेक्स स्कँडलच्या पीडितांना पाठिंबा देण्याऐवजी अनेक स्थानिक माध्यमे त्यांच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करत होते. ज्या लॅबमध्ये फोटो काढण्यात आले, त्या लॅबमधील प्रक्रिया करणारे तंत्रज्ञ, त्याची माहिती असलेले पत्रकार या सर्वांनी मिळून ब्लॅकमेलिंगचा वेगवेगळा धंदा चालवल्याचा आरोप आहे. परिस्थितीचा फायदा घेत प्रत्येकाने पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळले.