
Nepal: गेल्या आठवड्यात माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest)वरून सुटका करण्यात आलेल्या 46 वर्षीय भारतीय गिर्यारोहकाचा (Mountaineer) काठमांडू (Kathmandu) येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ज्यामुळे जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करताना एकूण मृतांची संख्या आठ झाली आहे. बंशीलाल असे या गिर्यारोहकाचे नाव असून त्याला गेल्या आठवड्यात एव्हरेस्टवरून विमानाने नेण्यात आले आणि नेपाळच्या राजधानीतील रुग्णालयात दाखल केले. त्यांचा काल रुग्णालयात मृत्यू झाला. पर्यटन विभागाचे राकेश गुरुंग यांनी वृत्तसंस्था एएफपीला यासंदर्भात दुजोरा दिला.
गेल्या वर्षी, 18 गिर्यारोहकांनी पर्वतावर आपला जीव गमावला, तो रेकॉर्डवरील सर्वात प्राणघातक हंगाम ठरला. याव्यतिरिक्त, इतर नेपाळी शिखरांवर चढाई करताना आणखी तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. जगातील दहा सर्वोच्च शिखरांपैकी आठ शिखरे असलेले नेपाळ, प्रत्येक वसंत ऋतूमध्ये शेकडो साहसी पर्यटकांना आकर्षित करतात. या हंगामात एव्हरेस्टवरील सर्व मृत्यू 8,000 मीटर (26,200 फूट) वरील "डेथ झोन" मध्ये झाले आहेत. जेथे पातळ हवा आणि कमी ऑक्सिजन पातळीमुळे उंचीवरील आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. (वाचा - अन्नपूर्णा पर्वत मोहिमेदरम्यान जखमी झालेले गिर्यारोहक Anurag Maloo यांना काठमांडूहून आणले भारतात; Adani Foundation ने केली एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था)
गिर्यारोहकांचा मृत्यू होऊनही यावर्षी अनेक विक्रम मोडले गेले आहेत. नेपाळी गिर्यारोहक फुंजो लामाम हिने 14 तास 31 मिनिटांत शिखर गाठून एका महिलेने सर्वात जलद एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम केला आहे. याव्यतिरिक्त, "एव्हरेस्ट मॅन" म्हणून ओळखले जाणारे 54 वर्षीय कामी रिता शेर्पा यांनी त्यांच्या पहिल्या चढाईनंतर तीन दशकांनंतर विक्रमी 30 व्यांदा शिखर गाठले. या वर्षी, नेपाळने 900 हून अधिक गिर्यारोहण परवाने जारी केले, ज्यात एव्हरेस्टसाठी 419 परवाने आहेत. गेल्या महिन्यात रोप फिक्सिंग टीम स्थापन केल्यानंतर 600 हून अधिक गिर्यारोहक आणि त्यांचे मार्गदर्शक एव्हरेस्टवर चढले आहेत.