G20 Summit: माझा विश्वास आहे की पंतप्रधान मोदी जगातील शांततेसाठी देशांना एकत्र आणतील, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे वक्तव्य
Emmanuel Macron And Narendra Modi (PC - Instagram)

भारताने 1 डिसेंबर रोजी औपचारिकपणे इंडोनेशियाकडून G20 गटाचे अध्यक्षपद स्वीकारले. G20 शिखर परिषद (G20 summit) पुढील वर्षी 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. ज्यामध्ये समूहातील देशांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. भारताने G20 गटाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारतात होणारी G20 शिखर परिषद निर्णायक ठरेल, अशी आशा अनेक देशांनी व्यक्त केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. जगात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी सर्वांना एकत्र करण्यात ते यशस्वी होतील, असे सांगितले.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्विट केले, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. भारताने G20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. मला खात्री आहे की माझे मित्र नरेंद्र मोदी जगात शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र आणतील. भारताने G20 साठी 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' ही थीम ठेवली आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आधी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले होते की ते G20 च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांचे मित्र पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देण्यास उत्सुक आहेत.

बिडेन म्हणाले, भारत हा अमेरिकेचा मजबूत भागीदार आहे. भारताच्या G20 अध्यक्ष असताना माझे मित्र पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी मी उत्साहित आहे.  हवामान, ऊर्जा आणि अन्न संकट यासारख्या समान आव्हानांचा सामना करताना दोन्ही देश शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा पाठपुरावा करतील, असे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले. हेही वाचा India is President of G20: G20 चे अध्यक्षपद आता औपचारीकरित्या भारताकडे, जगभरातून होतयं भारतचं कौतुक

ते म्हणाले, भारताचे G-20 प्राधान्यक्रम केवळ आमच्या G-20 भागीदारांशीच नव्हे, तर जगाच्या दक्षिणेकडील आमच्या सहकारी देशांशीही चर्चा करून आकारले जातील, ज्यांचे आवाज अनेकदा ऐकले जात नाहीत. त्याच वेळी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी सांगितले की, जग भारताकडे त्या देशांचा आवाज म्हणून पाहते जे बदलत्या जागतिक व्यवस्थेत मागे राहिले आहेत.

बिर्ला म्हणाले की, कोविड-19 या जागतिक महामारीदरम्यान भारताने 150 हून अधिक देशांना कोरोनाची लस आणि इतर मदत देऊन हा सन्मान मिळवला आहे.  यापेक्षा ‘वसुधैव कुटुंबकम’चे मोठे उदाहरण काय असू शकते, असे ते म्हणाले.  भारताने केवळ आपल्या लोकांची काळजी घेतली नाही, तर गरजेच्या वेळी इतर देशांच्या पाठीशी उभे राहिले.