Coronavirus: विराट कोहली, RCB ने फ्रंटलाइन वॉरियर्सच केले कौतुक; 'विजयात उशीत होत असला तरी' लोकांना घरातच रहाण्यासाठी केले आवाहन, पाहा Video
विराट कोहली (Photo Credits: Facebook/@RCB)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर जग लॉकडाउनमध्ये आहे आणि अनेक लोकं आपला वेळ एकांतवासात घालवत आहेत. या जीवघेणा विषाणूने आतापर्यंत जगात 1,45,000 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. भारतात 13,000 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आणि 452 मृत्यूची नोंद झाली आहे. अशा कठीण परिस्थितीचा विचार करता, भारतात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगही (IPL) यंदा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. अशा कठीण परिस्थितीत, क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रमुख सदस्य साथीच्या आजारात आपले योगदान देण्यास पुढे सरसावले. सुरेश रैना, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मासह अनेक क्रिकेटपटूंनी साथीच्या साथीच्या विरूद्ध युद्धात मदत करण्यासाठी देणगी दिली आहे. कोविड-19 विरूद्ध लढाईत काम करणाऱ्यांसाठी अनेक क्रिकेटर्सने सोशल मीडियावर संदेशही पोस्ट केले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि विराटनेही जीव मुठीत धरणारे आणि देशातील साथीच्या आजाराचे परिणाम रोखण्यासाठी मदत करणाऱ्यांसाठी फ्रंटलाइन वॉरियर्सचा व्हिडिओ प्रसिद्ध करून पाठिंबा दर्शविला. (कोरी अँडरसनने विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाची केली तुलना, म्हणाला दोघांच्या 'या' क्वालिटीमुळे टीम इंडियाला मिळतंय यश)

आरसीबीने व्हिडिओमध्ये लोकांना एक संदेश केला आहे. वाईट काळ चालू आहे पण तो बराच काळ टिकणार नाही, लोकांना फक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, घरात राहण्याची आणि मदतीसाठी समोर उभे असलेल्यांना सलाम करण्याची गरज आहे." या व्हिडिओमध्ये सर्वोत्कृष्ट रॅपद्वारे हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराटनेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराटने या व्हिडिओसह लिहिले आहे की, 'आम्ही अग्रभागी योद्ध्यांना सलाम करतो आणि आपणासही जे कोविड-19 च्या या लढाईत धैर्यवान आहात. सोशल डिस्टंसिंगचे गंभीरतेने अनुसरण करा.'

सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता गुरुवारी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. आयपीएल 2020ची सुरुवात 29 मार्चपासून होणार होती, त्यानंतर 15 एप्रिलला पुढे ढकलण्यात आली. परंतु देशात लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवल्यानंतर निर्णय बदलण्याची घोषणा करण्यात आली.