IND WTC Final 2025 Qualification Scenario: ॲडलेडमधील पराभवनंतर टीम इंडियाचा डब्ल्यूटीसी फायनलचा मार्ग कठीण, जाणून घ्या अजूनही कसे ठरू शकतात पात्र
IND vs AUS: डब्ल्यूटीसीच्या ताज्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. कांगारू संघानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. जिथे ऑस्ट्रेलियाला 60.71 टक्के गुण आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 59.26 टक्के गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचे आता 57.29 टक्के गुण आहेत.
IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेडमधील पराभव भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक अर्थाने वेदनादायी आहे. या पराभवामुळे बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकण्याचा मार्ग तर अवघड झाला आहेच, पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2025)चा मार्गही कठीण झाला आहे. आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ताज्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. डब्ल्यूटीसीच्या ताज्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. कांगारू संघानंतर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. जिथे ऑस्ट्रेलियाला 60.71 टक्के गुण आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 59.26 टक्के गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचे आता 57.29 टक्के गुण आहेत. ॲडलेडपूर्वी टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती, पण ॲडलेडच्या पराभवाने क्षणार्धात सर्वकाही बदलून टाकले आहे.
Here’s the updated WTC points table following Australia's dominant Test win in the second Test against India in Adelaide.
India slips to third place, while Australia regains their top spot in the rankings. pic.twitter.com/6SVgCabNdn
— CricTracker (@Cricketracker) December 8, 2024
आणखी एक पराभव आणि सर्व आशा संपुष्टात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत अजून तीन कसोटी सामने बाकी आहेत. आता टीम इंडियाने एकही कसोटी सामना गमावला, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्वबळावर अंतिम फेरी गाठण्याच्या त्याच्या सर्व आशा संपुष्टात येतील. भारताने एक कसोटी अनिर्णित राहिली आणि दोन कसोटी सामने जिंकले तर त्याच्या आशा जिवंत राहतील. मात्र, अंतिम तिकीट निश्चित करण्यासाठी भारताला उर्वरित तीन कसोटी सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील.
कसे आहे ते समीकरण जाणून घ्या
टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला तर ते टॉप-2 मध्ये कायम राहील. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तिथे ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा नसेल. मात्र, दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. यामध्ये आफ्रिकन संघाच्या विजयाची अधिक शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याची शर्यत खूपच रोमांचक बनली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2024 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

