World Cup 2011 फायनल सामन्यात ‘या’ कारणामुळे MS Dhoni ने स्वतःला युवराज सिंहच्या वर बढती दिली, श्रीलंकन दिग्गजचे मोठे भाष्य
श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथैया मुरलीधरनने भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण सांगितली जेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी वर्ल्ड कप 2011 फायनल सामन्यात युवराज सिंहच्या आधी फलंदाजीला येत एक मोठा निर्णय घेतला. युवी त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. धोनी मात्र अंतिम सामन्यात पहिला आला आणि भारताला 28 वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेता बनवले.
श्रीलंकेचा (Sri Lanka) महान ऑफस्पिनर मुथैया मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण सांगितली जेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) वर्ल्ड कप (World Cup) 2011 फायनल सामन्यात युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) आधी फलंदाजीला येत एक मोठा निर्णय घेतला. युवी त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. धोनी मात्र अंतिम सामन्यात पहिला आला आणि त्याने विजयी धावा केल्या व भारताला 28 वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेता बनवले. एमएस धोनी युवराज सिंहच्या आधी फलंदाजीला आला की नाही याची अनेक कारणे अनेक वर्षांपासून चाहते आणि तज्ञांनी दिली आहेत. धोनीने श्रीलंकेविरुद्ध मुंबईत झालेल्या रंगतदार सामन्यात 91 धावांची नाबाद कामगिरी बजावली. मुरलीधरन म्हणाले की त्यांना वाटते की तत्कालीन भारतीय कर्णधाराने युवराजच्या पुढे स्वत:ला बढती देण्याचे कारण त्याच्या दुसरा असू शकते. (T20 World Cup: टीम इंडियाचे 2016 टी-20 वर्ल्ड कप संघाचे ‘हे’ 10 स्टार सदस्य 2021 मध्ये खेळणार नाहीत)
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना या जोडीने ड्रेसिंग रूम शेअर केल्यावर धोनीने आपल्या दुसराचा सामना कसा करावा हे शिकले, असे मुरलीधरनने सांगितले. “मी म्हणेन की जेव्हा मी त्याला चेन्नईमध्ये गोलंदाजी करत होतो तेव्हा धोनीने ते शेवटपर्यंत वाचले. मला आठवते की विश्वचषकात, युवराजला माझ्याबद्दल काहीच सुचत नव्हते. तो येणार होता पण मला वाटले की माझ्यामुळे धोनी आला (युवराजच्या पुढे),” मुरलीधरन ESPNCricinfo वर म्हणाले. 2011 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मुरलीधरनने सांगितले की, फार कमी भारतीय खेळाडू आहेत जे त्याचा दुरा वाचू शकतात. मुरलीधरन वनडे आणि कसोटीत अनुक्रमे 534 आणि 800 विकेटसह सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.
मुरलीधरनने पुढे म्हटले की, “सचिनला (तेंडुलकर) निश्चितपणे वाचता आले. मला वाटले की राहुल (द्रविड) ते इतक्या चांगल्याप्रकारे खेळता आले नाही. (VVS) लक्ष्मणने तसेच गौतम गंभीरने चांगले ओळखले. (वीरेंद्र) सेहवागला ओळखता आले की नाही मला माहित नाही. जेव्हा मी दुसरा टाकला, तेव्हा मी वेग वापरला नाही. तर वेगाने, तुम्ही ते पाहू शकत नाही, तुम्हाला ते माझ्या मनगटातून पाहावे लागते. श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये (कुमार) संगकारा, महेला (जयवर्धने), अरविंद डिसिल्वा, मारवन अटापट्टू यांनी ते ओळखले. (तिलकरत्ने) दिलशानला कधीच सुगावा लागला नव्हता.”
(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2021 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

