
अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) चा फलंदाज राहुल दलाल (Rahul Dalal) 2019-20 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगामात सर्वाधिक धावा करणारा करणारा फलंदाज ठरला. मेहलयाचा मागील सत्रातील नायक मिलिंद कुमारच्या 1,331 धावांना मागे टाकत राहुलच्या 1,340 धावा रणजीच्या एका मोसमात फलंदाजाने केलेल्या दुसऱ्या सर्वाधिक धावा आहेत. राहुलने यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा केल्या असल्या तरीही भारताच्या मधल्या फळीतील माजी फलंदाज व्हीव्हीस लक्ष्मण (VVS Laxman) याच्या एका मोसमात रणजी धावांचा विक्रम अजूनही अबाधित राहिला. लक्ष्मणने 1999-00 च्या हंगामात 1,415 धावा केल्या. लक्ष्मणला मागे टाकण्यापासून राहुलला फक्त 13 धावा कमी पडल्या आणि एका मोसमात केलेली आजवरच्या या सर्वाधिक धावा आहेत. राहुलला मात्र आता आणखी मुदत वाढ मिळण्याची शक्यता नाही कारण अरुणाचल प्रदेश या हंगामात एकही सामना जिंकला नसल्याने तो आधीच क्वार्टर फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. (Ranji Trophy: चंदीगड ने मणिपूरविरुद्ध रणजी ट्रॉफी सामन्याच्या पहिल्या डावात घेतली चौथी सर्वात मोठी धावांची आघाडी, रचला इतिहास)
दरम्यान, जर राहुल चालू हंगामात अव्वल धावा करणारा फलंदाज बसला तर उत्तर-पूर्व संघातील खेळाडूने 2 वर्षांतले दुसरे पराक्रम ठरेल. लोढा सुधारणांनी रणजी करंडकात 7 प्रादेशिक राज्यांपैकी प्रत्येकी एक संघाचा समावेश करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, 1999-00 चा हंगाम लक्ष्मणसाठी यशस्वी ठरला. त्याने रणजी सामन्यानंतर कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 281 धावांचा अविश्वसनीय खेळ केला- ज्याने आगामी काळात भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला.
दुसरीकडे, सरफराज खानसाठी 2019-20 रणजी करंडक संपला असून त्याने अवघ्या 6 सामन्यांमधून एकूण 928 धावा केल्या आहेत. महाराष्ट्रविरुद्ध 6 धावांविरुद्ध आऊट झाला असला तरीही सरफराजने यंदा एक तिहेरी आणि दुहेरी शतक ठोकले आहे.