Maharashtra Monsoon Update: मुसळधार पाऊस असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढणार, हवामान विभागाने वर्तवला सुधारीत अंदाज

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन काहीसे उशीरानेच झाले. त्यातच पावसाचा वेगही मंदावला आहे. अशात हवामान विभाने (IMD) वर्तवलेल्या नव्या अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा तब्बल 27% कमी पाऊस पडला आहे. तशी नोंद झाली आहे.

Maharashtra Monsoon Update: मुसळधार पाऊस असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढणार, हवामान विभागाने वर्तवला सुधारीत अंदाज
Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Maharashtra Rain Update's: मुसळधार पाऊस (Heavy Rain), राज्यातील अनेक ठिकाणी बरसत आहे. हे चित्र राज्यातील सर्व जिल्हे, तालुके आणि गावखेड्यांमध्ये नाही. अनेक ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यात यंदा मान्सूनचे आगमन काहीसे उशीरानेच झाले. त्यातच पावसाचा वेगही मंदावला आहे. अशात हवामान विभाने (IMD) वर्तवलेल्या नव्या अंदाजामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, यंदाच्या वर्षी राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा तब्बल 27% कमी पाऊस पडला आहे. तशी नोंद झाली आहे. पावसाळा संपायला अद्याप अवधी असला तरी दरवर्षीचे सरासरी प्रमाण काढले तर यंदा पावसाचे काही खरे नाही असेच दिसत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा पावसाची नोंद फारच कमी झाली आहे. दुसऱ्या बाजूला यंदाच्या पावसावर एल निनोचेही सावट पाहायला मिळत आहे. ज्यामुळे यंदा मोसमी पावसावर मर्यादा आल्याचे पाहायला मिळू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र, पावसाचा दीर्घकालीन अंदाज पाहिला तर सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Alert: येत्या 24 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोकणाला रेड अ‍ॅलर्ट)

मान्सून ऋतूमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि तो अनेक महिने टिकतो. "मान्सून" हा शब्द अरबी शब्द "मौसीम" पासून आला आहे. ज्याचा अर्थ "ऋतू" आहे. ही संकल्पना सामान्यतः भारतीय उपखंडाशी संबंधित आहे. परंतु मान्सून ही संकल्पना जगाच्या इतर भागांमध्ये देखील आढळते. जसे की आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि आफ्रिका आणि अमेरिकाचा काही भाग. पावसाळ्यात, जमीन आणि समुद्र यांच्यातील तापमानाच्या फरकामुळे समुद्रातून उबदार आणि ओलसर हवा जमिनीच्या भागाकडे खेचली जाते. हवेची ही हालचाल वाऱ्याच्या दिशेने बदल घडवून आणते, ज्यामुळे प्रचलित वाऱ्याचे स्वरूप उलटे होते. भारतीय उपखंडात, उदाहरणार्थ, उन्हाळी पावसाळा नैऋत्येकडून ओलसर हवा आणतो, तर हिवाळ्यात मान्सून ईशान्येकडून कोरडी हवा आणतो.

मान्सून हंगामात विशेषत: मुसळधार पाऊस, गडगडाटी वादळे आणि कधी कधी चक्रीवादळे येतात. नद्या, जलाशय आणि भूजल यांसारख्या जलस्रोतांची पूर्तता करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जे या प्रदेशांमध्ये शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि एकूणच पर्यावरणीय आरोग्यासाठी आवश्यक आहेत. मान्सूनचा पाऊस हा शेतीसाठी आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असला तरी, जास्त किंवा अपुऱ्या पावसामुळे पूर, भूस्खलन, पीकांसाठी प्रतिकुल/अनुकुल वातावरण आणि पाण्याची टंचाई यासारखी विविध आव्हाने उद्भवू शकतात. हे धोके कमी करण्यासाठी सिंचन व्यवस्था आणि पूर नियंत्रण उपायांसह जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2023 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).