Hanuman Jayanti 2025 Messages

Hanuman Jayanti 2025 Messages in Marathi: भगवान हनुमान (Lord Hanuman) हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय आणि प्रेरणादायी देवता आहेत. त्यांचा जन्म अंजनी आणि केसरी या दांपत्याला झाला असून, वायुदेवाच्या आशीर्वादाने त्यांचे जीवन सुरू झाले. म्हणूनच त्यांना ‘पवनपुत्र’ असेही संबोधले जाते. हिंदू चंद्र पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती (Lord Hanuman Jayanti 2025) साजरी केली जाते. यंदा शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होईल. हनुमान हे शक्ती, साहस, बुद्धिमत्ता आणि निष्ठेचे मूर्तिमंत रूप मानले जातात. त्यांनी श्रीरामांना सीतामाईला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, आणि त्यांची ही भक्ती आजही लाखो लोकांना प्रेरणा देते.

या वर्षी पौर्णिमा तिथी 12 एप्रिल रोजी पहाटे 3.21 वाजता सुरू होईल आणि 13 एप्रिल रोजी पहाटे 5.51 वाजता संपेल. हनुमान हे त्यांच्या अपार शक्ती, धैर्य आणि श्रीरामांवरील अटळ भक्तीसाठी ओळखले जातात. त्यांचा हा जन्मोत्सव त्यांच्या या गुणांचा सन्मान करण्यासाठी आणि भक्तांना संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी साजरा केला जातो. हनुमानाच्या पूजेमुळे भक्तांना संकटांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच ते संकटमोचन म्हणून प्रसिद्ध आहेत.

या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ होतो. काही ठिकाणी हनुमानाचा पाळणा म्हटला जातो. पूजेनंतर सर्वांना प्रसाद वाटला जातो. या दिवशी व्रत-उपवास यांचे पालन केले जाते. रामायणातील सुंदर कांड, तसेच हनुमान चालीसाचा पाठ वाचला जातो.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देत साजरा करा हा मंगलमय दिवस.

Hanuman Jayanti 2025 Messages
Hanuman Jayanti 2025 Messages
Hanuman Jayanti 2025 Messages
Hanuman Jayanti 2025 Messages
Hanuman Jayanti 2025 Messages

दरम्यान, हनुमान जयंतीचे स्वरूप वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळे असते. उत्तर भारतात चैत्र पौर्णिमेला हा सण साजरा होतो, तर दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमध्ये, काही ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात हनुमान जयंती पाळली जाते. ही भिन्नता स्थानिक परंपरा आणि पंचांगावर अवलंबून आहे. पण सर्वत्र हनुमानाच्या शक्ती आणि भक्तीची महती एकच आहे. (हेही वाचा: हनुमान जयंती शुभ मुहूर्त व पूजा विधी)

हनुमान यांनी लंकेत उडी मारून सीतामाईचा शोध घेतला, रावणाच्या सैन्याला पराभूत केले आणि संजीवनी औषध घेऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवले. या सर्व कृतींमधून त्यांचे धैर्य आणि बुद्धिचातुर्य दिसून येते. हनुमान हे ब्रह्मचारी राहिले आणि त्यांनी आपले जीवन पूर्णपणे श्रीरामांच्या सेवेत समर्पित केले. म्हणूनच ते संयम, आत्मसंयम आणि एकनिष्ठतेचे प्रतीक मानले जातात. असे म्हणतात की, जोपर्यंत पृथ्वीवर श्रीरामांचे नाव घेतले जाईल, तोपर्यंत हनुमान आपल्या भक्तांची रक्षा करत राहतील.