Dhulivandan 2023 HD Images: धुलीवंदन मराठी शुभेच्छा, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करत साजरा करा रंगाचा उत्सव

मराठी पंचागानुसार फाल्गून महिन्यात येणारा धुलीवंदन (Dhulivandan 2023 HD Images) हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. खास करुन महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व असते. हा सण होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. हा सण कृषी संस्कृतीशी जोडला गेला असल्याने गावकऱ्यांमध्ये या सणाला अधिक महत्त्व दिले जाते. आदल्या दिवशी गावात होळी (Holi 2023 Images) पेटवली जाते. त्याची राख गोळा करुन दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो.  या सणानिमित्त नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणही Wishes, Greetings, WhatsApp Status, Quotes, Images शेअर करून तुम्ही रंगाचा उत्सव साजरा करु शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास शिवजयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

शहरांमध्ये या सणाचे स्वरुप काहीसे मर्यादीत झाल्याचे पाहायला मिळते. केवळ रंग खेळणे इतक्याच मर्यादी. स्वरुपात याकडे पाहिले जाते. पण ग्रामीण भागात तसे नसते. या सणाला प्रादेशिक रुढी, परंपरांनी महत्त्व प्राप्त झालेले असते. त्यामुळे रंगांची उथळण असे याचे मुख्य स्वरुप असले तरी वेगवेगळ्या भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. (हेही वाचा, होळीवर आधारित बॉलीवूडची सर्वोत्तम गाणी, पार्टीचा उत्साह होईल द्विगुणित (व्हिडिओ पहा))

धुलीवंदनाला   रंग उधळण्याची पद्धत खरेतर महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात या दिवशी राड (राळ) उडवली जाते. ज्यात होळीच्या दुसऱ्या दिवशीच्या राखेचा वापर केला जातो. पण, शहरात केवळ दुकानातून आणलेले रंग वापरले जातात.

धुलिवंदन हा सण विविध पौराणिक कथा आणि दंतकथांशीही निगडीत आहे. अशाच एका कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय राधेच्या गावी गेले आणि गावातील लोकांनी प्रेम आणि आपुलकीचा हावभाव म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर रंग लावले. तेव्हापासून, ही परंपरा उत्सवाचा एक भाग बनली आहे आणि लोक या दिवशी एकमेकांना रंग देतात, रंग लावतातही.

धुलिवंदन म्हणजे केवळ रंग खेळणे नव्हे, तर सामाजिक सलोखा आणि बंधुता वाढवणारा सण म्हणूनही याकडे पाहिले जाते. या दिवशी लोक त्यांच्यातील मतभेद विसरून एकत्र येतात आणि उत्सव साजरा करतात. हा सण विविध क्षेत्रातील, जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणतो आणि एकता आणि प्रेमाचा संदेश देतो.

एकूणच धुलिवंदन हा आनंदाचा, आनंदाचा आणि एकात्मतेचा सण आहे. हा सण लोकांमध्ये एकता आणि बंधुत्वाची भावना वाढवतो. प्रेम आणि सौहार्दाचा संदेश पसरवते. हा सण भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे आणि लोक दरवर्षी या सणाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात.