Food Wastage: भारतामध्ये प्रत्येक वर्षी प्रती व्यक्ती 50 किलो अन्नाची नासाडी; UNEP च्या अहवालामधून धक्कादायक माहिती

2020 मध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामध्ये जवळजवळ प्रत्येकालाच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यावेळी काही लोकांनी ‘अन्न समस्या’ देखील अनुभवली. अन्नाच्या एका घासाची किंमत त्यावेळी जाणवली. सर्वसामान्यपणे भारतासह अनेक देशांमध्ये अन्नाची नासाडी (Food Wastage) होते

Food Wastage: भारतामध्ये प्रत्येक वर्षी प्रती व्यक्ती 50 किलो अन्नाची नासाडी; UNEP च्या अहवालामधून धक्कादायक माहिती
संग्रहित संपादित प्रतिमा (Photo Credit: Facebook)

2020 मध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामध्ये जवळजवळ प्रत्येकालाच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यावेळी काही लोकांनी ‘अन्न समस्या’ देखील अनुभवली. अन्नाच्या एका घासाची किंमत त्यावेळी जाणवली. सर्वसामान्यपणे भारतासह अनेक देशांमध्ये अन्नाची नासाडी (Food Wastage) होते. आता याबाबतचे आकडे समोर आले आहेत, जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 2019 मध्ये जगभरात अंदाजे 93 कोटी 10 लाख टन अन्न वाया गेले होते, जे एकूण उपलब्ध अन्नापैकी 17 टक्के आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) याबाब माहिती दिली आहे.

यूएनने तयार केलेल्या यूएन फूड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट 2021 नुसार घरे, किरकोळ दुकानदार, रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी जेवणाची सेवा दिली गेली होती तेथे बर्‍यापैकी अन्न वाया गेले. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांनी गुरुवारी हे निर्देशांक जाहीर केले. एक भारतीय कुटुंब दर वर्षी प्रति व्यक्ती 50 किलो अन्न वाया घालवते. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये हा आकडा 74 किलो आहे. अहवालानुसार, बऱ्याच देशांना हे माहीतच नाही ते किती अन्न वाया घालवतात. त्या त्या देशांच्या सरकारांनी याचा मागोवा घेणे आवश्यक आहे जेणेकरून स्पष्ट चित्र दिसू शकेल.

जर भारतामधील 2019-20 मधील अन्नधान्ये, तेलबिया, ऊस आणि फळबाग यांचे एकूण उत्पादन जोडले तर ते वाया गेलेल्या अन्नाच्या बरोबरीचे आहे. अहवालात असे म्हटले आहे की बहुतेक अन्न घरांमध्ये वाया जाते, त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि खाद्य पुरवठा कर देण्यासाठी इतर ठिकाणी आणि नंतर किरकोळ दुकानात. अहवालानुसार जगात दर वर्षी 121 किलो अन्न वाया जात आहे. यामध्ये घरांचा वाटा ​​74 किलो आहे.

आशियाई देशांमध्ये अफगाणिस्तान 82 किलोसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ नेपाळ 79 किलो, श्रीलंका 76 किलो, पाकिस्तान 74 किलो आणि बांगलादेश 65 किलो आहे. दरम्यान, एका बाजूला अन्नाचा अपव्यय आहे तर दुसरीकडे अन्नाची समस्या आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (यूएनएफएओ) मते, 2019 मध्ये 69 दशलक्ष लोक भुकेले होते. फूड वेस्ट इंडेक्सच्या अहवालानुसार, कोविड-19 साथीच्या काळात उपासमार झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2021 08:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).