
भारताच्या सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञान परंपरेचा गौरव करत, भगवद्गीता(Bhagavad Gita UNESCO) आणि भारत मुनिंचे नाट्यशास्त्र (Natyashastra Bharat Muni) यांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ (UNESCO Memory of the World) मध्ये समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोच्या या उपक्रमाचा उद्देश जागतिक महत्त्वाच्या दस्तऐवजी वारशांचे (Indian Heritage UNESCO) संरक्षण करणे हा आहे. एप्रिल 17 रोजी, युनेस्कोने 72 देशांतील व 4 आंतरराष्ट्रीय संस्थांकडून आलेल्या एकूण 74 दस्तऐवजी संग्रह यामध्ये समाविष्ट केले. आता या जागतिक नोंदणीत एकूण 570 नोंदी आहेत.
पंतप्रधानांसह सरकारकडून युनोस्कोचे कौतुक
भगवद्गीता आणि भारत मुनिंचे नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ मध्ये झालेल्या समावेशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले: जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण! भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा युनेस्कोच्या 'मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर' मध्ये समावेश हा आपल्या शाश्वत ज्ञान आणि समृद्ध परंपरेचा जागतिक सन्मान आहे. या ग्रंथांनी शतकानुशतकं सभ्यतेचे व सामूहिक चेतनेचे पालनपोषण केले आहे, आणि आजही जगभर प्रेरणा देत आहेत. (हेही वाचा, Bhagavad Gita: आता शाळांमध्ये शिकवली जाणार 'भगवत गीता'; 'या' राज्यातील सरकारने केली घोषणा)
संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनीही X वर पोस्ट करत याला, 'भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी ऐतिहासिक क्षण' असे संबोधले. हे कालातीत ग्रंथ केवळ साहित्यिक नव्हेत, तर ते तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्राचे आधारस्तंभ आहेत, ज्यांनी भारतीय विचारसरणी आणि अभिव्यक्तीचा पाया रचला आहे, असे शेखावत यांनी नमूद केले. या समावेशासह, भारताकडून युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ मध्ये आता एकूण 14 नोंदी आहेत. (हेही वाचा, UNESCO World Heritage Site: आसामच्या Charaideo Maidam चा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश; भारतामधील 43 वे स्थळ)
भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचे जागतिक महत्त्व
भगवद्गीता ही महाभारतातील एक पवित्र ग्रंथ असून ती धर्म, कर्म आणि आत्मसाक्षात्काराचे शाश्वत तत्त्वज्ञान मांडते. जगभरातील आध्यात्मिक व बौद्धिक विचारधारेवर याचा प्रभाव आहे. नाट्यशास्त्र, भारत मुनिंनी लिहिलेला, हा प्राचीन नाट्य, संगीत, नृत्य, सौंदर्यशास्त्र व रंगमंचकलेवरील ग्रंथ आहे. आजही भारतीय अभिजात नाट्यकलेचा तो आधार मानला जातो. या दोन ग्रंथांचा समावेश हा भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे जागतिक स्तरावर मान्यतेचे प्रतीक आहे.
पंतप्रधान आणि पर्यटन मंत्र्यांकडून एक्स पोस्ट
A proud moment for every Indian across the world!
The inclusion of the Gita and Natyashastra in UNESCO’s Memory of the World Register is a global recognition of our timeless wisdom and rich culture.
The Gita and Natyashastra have nurtured civilisation, and consciousness for… https://t.co/ZPutb5heUT
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2025
भारताच्या याआधीच्या नोंदींमध्ये खालील बाबींचा समावेश आहे
- ऋग्वेद हस्तलिखितं
- महात्मा गांधींचे दस्तऐवज
- तामिळनाडू व ओडिशातील पामपत्र हस्तलिखितं
या नव्या नोंदींसह, भारताने जगातील सांस्कृतिक नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
1992 मध्ये स्थापन झालेल्या या युनेस्को उपक्रमाचा उद्देश सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि बौद्धिक महत्त्व असलेले दस्तऐवजी वारसे जतन करणे व जनजागृती करणे आहे.