रेस्टॉरंट्स, इटरीज, मिठाईची दुकाने (फक्त Take Away/Home Delivery), महामार्गावरील धाबे, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल, एसी, कूलर, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल मटेरियल व इलेक्ट्रॉनिक दुरुस्तीची दुकाने आणि ऑटोमोबाईल विक्रीची दुकाने उघडली जाण्याची शक्यता. राजस्थान सरकारने याबाबत माहिती दिली.

राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मे महिन्यात घेणे बंधनकारक असलेली #ग्रामसभा यंदा होऊ शकणार नाही.

अमेरिका, ब्रिटन आणि युएईसाठीअसलेले 5.08 लाख मास्क, 57 लिटर सॅनिटायझर, 952 पीपीई किट्स असलेली अनेक शिपमेंट जप्त करण्यात आली आहे आहेत.

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे की, काश्मिरी दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ला “टेरर रिव्हिव्हल फ्रंट” म्हटले पाहिजे. टेरर रिव्हिव्हल फ्रंटला पाकिस्तानकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपिड चाचणीत राज्यात सात नवीन कोरोना व्हायरस प्रकरणे सापडली आहेत. याची पुष्टी होणे अजून बाकी आहे.

दिल्लीच्या उत्तम नगर पोलिस स्टेशनच्या SHO ना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पोलिस ठाण्यातील 6 कर्मचार्‍यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

राज्यात सद्यस्थिती 65 हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून, त्यापैकी 35 हजार उद्योगांचे उत्पादन सुरू झाले आहे. यामध्ये सुमारे नऊ लाख कामगार रुजू झाले असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 

मुंबईत 800 नवीन रुग्णांसह कोरोना व्हायरसच्या एकूण संक्रमितांची संख्या 15,581 झाली. यामध्ये 40 मृतांचा समावेश आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यांत अडकलेल्या कामगार, मजुरांची ने-आण करण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधी मधून भरण्यात येणार आहे. यासाठी सर्व जिल्ह्यांना 54 कोटी 75 लाख 47 हजार 70 इतका निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच कोरोना विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान साहाय्यता निधीतून 3 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. एएनआयचे ट्वीट-

 

Load More

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईसाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. देशाच्या GDP च्या 10% असणारे हे पॅकेज मुख्यतः जमीन, कामगार, लिक्विडीटी या मुद्द्यांना धरून काम करेल. शेतकरी, कामगार वर्ग, लघुउद्योग, कुटीर उद्योग, यासाठी मदत देणाऱ्या या पॅकेज मधून देशाला आत्मनिर्भर बनवण्याची सुरुवात करत आहोत असेही मोदींनी सांगितले आहे. या आर्थिक पॅकेज चे वाटप कशाप्रकारे होणार याबाबत मात्र अजून केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही. दुसरीकडे काल पंतप्रधान मोदी यांनी लॉक डाऊन 4 (Lockdown 4.0) संदर्भात सुद्धा घोषणा केली. सध्या सुरु असणारे लॉक डाऊन 17 मे ला संपत आहे, त्याआधी देशवासियांना वाढीव लॉक डाउनच्या तारखा कळवल्या जातील, मात्र या तिन्ही लॉक डाऊन पेक्षा वेगळे नियम यावेळेस फॉलो करावे लागणार आहेत असे मोदींनी म्हंटले आहे. Lockdown: लॉकडाऊन वाढविण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

दुसरीकडे देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक दुप्पट वेगाने वाढत आहे. सद्य घडीला देशात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ही 70,756 इतकी असून यापैकी 46, 008 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 2293 जणांचा मृत्यू झाला आहे तर बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा हा 22, 454 इतका आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी काल दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ही 31% आहे तर तुलनेने मृत्युदर हा खूपच कमी आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन शिथील झाला तरी जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत, असे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात आज वर 24 हजाराहून अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. तर कोरोनावर मात केलेल्यांची ख्या ही 5,125 इतकी आहे.