31 मार्च अगोदर पूर्ण करा 'हे' 7 काम; 1 एप्रिलपासून करावा लागणार नाही कोणत्याही अडथळ्याचा सामना
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2021 पासून सुरू होत आहे. नवीन आर्थिक वर्षात आपल्या जीवनात बरेच बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम खिशात होणार आहे. त्याच वेळी, आयकर विभाग तसेच बँकेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कामांची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. जर आपण हे कामं 31 मार्चपूर्वी पूर्ण केले नाही, तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे 31 मार्च अगोदर खालील 7 काम पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला 1 एप्रिलापासून अडथळ्यांना सामोर जाव लागेल. चला तर मग या महत्त्वाच्या कामांविषयी जाणून घेऊयात.

पीएनबी ग्राहकांनी हे महत्त्वपूर्ण काम 31 मार्चपर्यंत करणे आवश्यक -

जर आपण देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेली पीएनबीचे खातेदार असाल तर आपल्याला 31 मार्च पर्यंत काही महत्त्वाचे काम करावे लागेल. अन्यथा तुमचा व्यवहारात अडथळा येऊ शकतो. पंजाब नॅशनल बँकेने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, जुना आयएफएससी आणि एमआयसीआर कोड 1 एप्रिलपासून बदलला जाईल. म्हणजेच 31 मार्च 2021 नंतर हे कोड कार्य करणार नाहीत. जर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला बँकेतून एक नवीन कोड घ्यावा लागेल. (वाचा - ICICI Bank Home Loan: घर विकत घेणाऱ्यांसाठी खुशखबर; SBI, HDFC, kotak Mahindra नंतर आता 'आयसीआयसीआय' बँकेने कमी केले गृह कर्जाचे व्याज दर)

ICICI बँकेचे 31 मार्च पर्यंत स्वस्त घर कर्ज -

आयसीआयसीआय बँकेने गृहकर्ज व्याजदरात 6.70 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. 75 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी 6.75 टक्के व्याज दिले जाईल. व्याजदराची ऑफर 31 मार्चपर्यंत वैध असल्याचे बँकेने म्हटले आहे. हा या दशकातील सर्वात कमी दर आहे.

एसबीआय 6.7% दराने 75 लाख गृह कर्ज -

होम लोनवर एसबीआय मोठी ऑफर देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 31 मार्च पर्यंत गृह कर्ज ग्राहकांच्या प्रक्रिया शुल्कावरील 100% सूट देऊन व्याजदर 6.7% पासून व्याजदरांसह 70 बीपीएस (बेस पॉइंट्स) पर्यंतची सूट जाहीर केली आहे. अर्जदाराच्या सीआयबीआयएलच्या स्कोअरवर अवलंबून कर्जाची रक्कम, व्याज आणि प्रक्रिया शुल्क माफ केले जाईल. ज्यांना गृह कर्जाचा लाभ घ्यायचा आहे, ते बॅंकेच्या योनो अॅपवरून होम लोनसाठी अर्ज करू शकतात. गृह कर्जासाठी अर्ज करण्यासाठी ग्राहक बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

किसान क्रेडिट कार्ड प्राप्त करण्यासाठी 31 मार्च पर्यंत संधी -

आपण शेतकरी असाल आणि आतापर्यंत तुम्ही आपलं शेतकरी क्रेडिट कार्ड (केसीसी) तयार केले नसेल तर निराश होऊ नका. सरकार 31 मार्च पर्यंत अभियान राबवून किसान क्रेडिट कार्ड बनवित आहे. अद्याप केसीसी न मिळालेले शेतकरी आपल्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधू शकतात. यासाठी सरकारने केसीसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. यासाठी शेतकर्‍यांना अत्यंत सोपा फॉर्म भरावा लागेल आणि त्यांना 15 दिवसात केसीसी मिळेल.

31 मार्च पर्यंत पंतप्रधान किसान योजनेची नोंदणी करा -

पंतप्रधान किसान सन्मान निधी घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या आता 11 कोटी 69 लाखांवर गेली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात येत आहे. ज्यानी आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केली नाही. त्यांनी त्यांनी 31 मार्चपूर्वी अर्ज केल्यास आणि त्यांचा अर्ज स्वीकारल्यास होळीनंतर त्यांना 2000 रुपये तसेच एप्रिल किंवा मेमध्ये 2000 रुपये दुसरा हप्ता मिळेल.

विवाद से विश्वास योजनेची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत -

प्राप्तिकर विभागाने थेट कर विवाद निराकरण योजनेअंतर्गत विवाद से विश्वास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च आणि देय देण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाने ट्विटरवर लिहिले आहे की, सीबीडीटीने विश्वस्त कायद्यांतर्गत हा वाद 31 मार्च 2020 पर्यंत घोषित करण्यासाठी मुदत वाढविली आहे. अतिरिक्त रकमेशिवाय देय देण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

31 मार्च 2021 नंतर क्यूआर कोडच्या तरतुदींचे पालन करणे अनिवार्य -

सरकारने कंपन्यांना आणि ग्राहक यांच्यातील व्यवहारांशी संबंधित बिलाच्या बाबतीत क्यूआर कोडच्या तरतुदींचे पालन न केल्यास दंड लावण्यास सूट दिली आहे. ही सूट 31 मार्च 2021 पर्यंत तयार झालेल्या बिलांसाठी देण्यात आली आहे. तथापि, कंपन्यांना 1 एप्रिल 2021 पासून क्यूआर कोडच्या तरतुदींचे पालन करणे अनिवार्य असेल.