Ukraine-Russia War: युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी घेतली सुरक्षा सज्जतेबाबत उच्चस्तरीय बैठक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही होते उपस्थित
PM Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी युक्रेनमध्ये (Ukraine) सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारताच्या सुरक्षा सज्जतेबाबत एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान केले. जेव्हापासून रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केले त्यानंतर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या आहेत. पंतप्रधानांव्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर बोलावण्यात आलेल्या या बैठकीत भारताची सुरक्षा सज्जता आणि सध्याचे जागतिक वातावरण यावर चर्चा करण्यात आली. खार्किवमध्ये मारले गेलेले नवीन शेखरप्पा यांचे पार्थिव परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी बैठकीत दिले.

रशिया-युक्रेन युद्ध 18 व्या दिवशी सुरू

या बैठकीत पीएम मोदींना युक्रेनमधील ताज्या घडामोडींबाबतही माहिती देण्यात आली की, ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय नागरिकांसह भारताच्या शेजारी देशांतील काही नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर काढण्यात आले आहे. सीमावर्ती भागात तसेच सागरी आणि हवाई क्षेत्रात भारताच्या सुरक्षा सज्जतेच्या विकासाची आणि विविध पैलूंबाबतही त्यांना माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सलग 18 व्या दिवशी युद्ध सुरूच आहे. जागतिक दबाव आणि देशांद्वारे कठोर निर्बंधांच्या घोषणेनंतरही, रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र करणे आणि निवासी भागांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. (हे ही वाचा Flex Fuel Vehicles: नितीन गडकरी म्हणाले- भारतात 6 महिन्यांत फ्लेक्स-इंधन वाहनांचे उत्पादन सुरू होईल, जाणून घ्या ही वाहने कशी काम करतात)

मारियुपोलमध्ये 1500 हून अधिक लोक मरण पावले

रशियाने अनेक युक्रेनियन शहरांवर बॉम्बफेक तीव्र केली आहे आणि राजधानी कीवच्या बाहेरील भागात गोळीबार केला आहे आणि देशाच्या दक्षिणेकडील मारियुपोलवर आपली पकड घट्ट केली आहे. रशियन आक्रमणाचा सर्वाधिक फटका मारियुपोलमध्ये बसला आहे. 430,000 लोकसंख्या असलेल्या शहरात अन्न, पाणी आणि औषध आणण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न सतत गोळीबारामुळे हाणून पडले आहेत. महापौर कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात मारियुपोलमध्ये 1,500 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि गोळीबारामुळे सामूहिक कबरींमध्ये मृतदेह दफन करण्याच्या प्रयत्नांना अडथळा येत आहे.