Bihar Snake: बिहारमधील एका व्यक्तीने दंश केल्याच्या रागात सापाला चावे घेत मारले ठार, काही वेळाने व्यक्तीचाही झाला मृत्यू

बिहारमधील एका व्यक्तीने विषारी साप चघळल्याची घटना समोर आली आहे. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने सापाला एवढे चावे घेतले की तो मरण पावला. यानंतर त्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे.

Bihar Snake: बिहारमधील एका व्यक्तीने दंश केल्याच्या रागात सापाला चावे घेत मारले ठार, काही वेळाने व्यक्तीचाही झाला मृत्यू
Snake (Photo Credits: Pixabay)

सापाने (Snake) माणसाला दंश केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. मात्र आता बिहारमधून (Bihar) एक वेगळीच घटना समोर आली आहे. बिहारमधील एका व्यक्तीने विषारी साप चघळल्याची घटना समोर आली आहे. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने सापाला एवढे चावे घेतले की तो मरण पावला. यानंतर त्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. व्यक्तीने उपचाराला नकार दिल्याने त्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी नालंदा (Nalanda) जिल्ह्यातील माधोपूर-दिह (Madhopur-dih) गावात घडली. 65 वर्षीय रामा महतो रविवारी संध्याकाळी आपल्या घराबाहेर बसले होते. तेव्हा एक प्राणघातक क्रेट साप (Crete snake) त्यांच्या पायाला चावला. संतापाच्या भरात त्याने सरपटणाऱ्या प्राण्याला त्याच्या हातात पकडले आणि ते चघळू लागले.

तुझी हिम्मत कशी झाली. तू मला चावलास आणि आता मी तुला चावेन. थोड्याच वेळात त्याने सापाला चावणे सुरू केले आणि सरपटणाऱ्या प्राण्याला ठार मारले. या प्रक्रियेत सापाने त्याच्या चेहऱ्याच्या अनेक भागांवर चावा घेतला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यक्तीने त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. सामान्य क्रेट साप ज्याला ब्लू क्रेट असेही म्हटले जाते. ही भारतीय उपखंडातील मूळची बांगारस वंशाच्या अत्यंत विषारी सापाची एक प्रजाती आहे. हे मोठ्या चार प्रजातींचे सदस्य आहे. जे बांगलादेश आणि भारतातील मानवांवर सर्वाधिक सर्पदंश करतात. बिहारमध्ये दरवर्षी साप चाव्यामुळे सुमारे 4,500 मृत्यू होतात.

भारतात गेल्या दोन दशकांमध्ये अंदाजे 1.2 दशलक्ष लोक सापाच्या चाव्यामुळे मरण पावले आहेत. जे दरवर्षी सरासरी 58,000 मृत्यू दर्शवतात. ज्यात 30-69 वर्षे वयोगटातील जवळपास अर्धे बळी आणि एक चतुर्थांश 15 वर्षांखालील मुले आहेत.या अहवालात म्हटले आहे की बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये दाट लोकवस्ती असलेल्या कमी उंचीच्या कृषी भागात राहणाऱ्या लोकांना या कालावधीत विशेषतः 70% मृत्यूंचा सामना करावा लागला. पावसाळी हंगाम जेव्हा साप आणि माणसांच्या भेटी घरी आणि घराबाहेर जास्त वेळा होतात. रसेलचे व्हाइपर, क्रेट्स आणि कोब्रा बहुतेक मृत्यूंसाठी जबाबदार होते. उर्वरित मृत्यू सापांच्या किमान 12 इतर प्रजातींमुळे झाले आहेत. असे ओपन एक्सेस ईलाईफमध्ये प्रकाशित आणि प्रमुख भारतीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. या सर्व प्रकणाची नोंद चंडी पोलीस ठाण्यात सर्पदंशाची एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2021 10:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).