Robot 'Vyommitra' to Fly Into Space: गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात जाणार महिला रोबोट 'व्योममित्र'; जाणून घ्या काय आहे ISRO ची योजना
गगनयान मोहिमेच्या आधी, 21 ऑक्टोबर रोजी फ्लाइट टीव्ही डी1 च्या यशस्वी चाचणीसह एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. या चाचणीच्या मदतीने अंतराळातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली क्रू एस्केप सिस्टीम आणि पॅराशूट सिस्टीमचे प्रमाणीकरण करण्यात आले.
Robot 'Vyommitra' to Fly Into Space: गगनयान मोहिमेच्या (Gaganyaan Mission) तयारीचा भाग म्हणून भारत या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रोबोट ‘व्योममित्र’ (Robot Astronaut Vyommitra) अवकाशात पाठवणार आहे. या रोबोटला महिला अंतराळवीराचा आकार देण्यात आला आहे. मुख्य गगनयान मिशन पुढील वर्षी 2025 मध्ये होणार आहे, त्याआधी ‘व्योममित्र’ अवकाशात उड्डाण घेईल. ‘गगनयान’ ही भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणारी भारताची मानवासह पहिली अंतराळ उड्डाण मोहीम आहे. यामध्ये तीन अंतराळवीरांना तीन दिवस पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर पाठवले जाईल.
‘व्योममित्र’ हे दोन संस्कृत शब्दांपासून बनवलेले नाव आहे. ‘व्योम’ (म्हणजे अंतराळ) आणि ‘मित्र’ (म्हणजे मित्र). ही महिला रोबोट अंतराळवीर मॉड्यूल पॅरामीटर्सचे निरीक्षण करण्याच्या, इशारा जारी करण्याच्या आणि लाइफ सपोर्ट ऑपरेशन्स चालविण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे. ‘व्योममित्र’ अंतराळवीराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, त्याला अंतराळातील वातावरणात मानवी कृतींचे अनुकरण करता येईल आणि ते जीवन समर्थन प्रणालीशी जोडले जाऊ शकते.
याचे महत्वाचे काम मानकांनुसार मिशनच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे हे असेल. काही त्रुटी आढळल्यास हा रोबोट त्वरित चेतावणी देईल. यामुळे मुख्य मोहिमेत अंतराळवीरांचे जीवन सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. या रोबोटमध्ये सहा पॅनल चालविण्याची क्षमता आहे. दरम्यान, इस्रोच्या गगनयान मोहिमेची रचना मानवी अंतराळ मोहिमेची क्षमता दाखवण्यासाठी करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत 3 जणांची टीम प्रथम अंतराळात 400 किमीच्या कक्षेत 3 दिवस प्रक्षेपित केली जाईल, नंतर समुद्रात उतरवून पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणली जाईल. (हेही वाचा: Moon Shrinking Research: आकुंचनामुळे चंद्राचा आकार होत आहे कमी; वाढत आहेत भूकंप आणि अनेक दोष, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती)
गगनयान मोहिमेच्या आधी, 21 ऑक्टोबर रोजी फ्लाइट टीव्ही डी1 च्या यशस्वी चाचणीसह एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. या चाचणीच्या मदतीने अंतराळातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली क्रू एस्केप सिस्टीम आणि पॅराशूट सिस्टीमचे प्रमाणीकरण करण्यात आले. अशाप्रकारे अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवाला अवकाशात पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2024 08:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

