T20 World Cup 2020: मेलबर्नमध्ये पुन्हा लॉकडाऊन, परिस्थिती पाहून तरी टी-20 वर्ल्ड कपबद्दल अंतिम निर्णय घ्या, BCCI चा ICC ला टोला

लियातील दुसरे सर्वात मोठे शहर मेलबर्नने बुधवारी मध्यरात्रीपासून दुसर्‍या फेरीच्या लॉकडाउनला सुरुवात केली आहे. आयसीसी स्पर्धा पुढे ढकलण्याच्या घोषणेस दिरंगाई करीत असली तरी आता तरी परिस्थिती पाहून आयसीसी त्वरित निर्णय घेईल यासाठी बीसीसीआयला आशावादी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यंदा आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम निर्णयाबाबत आयसीसी विलंब करत आहे.

T20 World Cup 2020: मेलबर्नमध्ये पुन्हा लॉकडाऊन, परिस्थिती पाहून तरी टी-20 वर्ल्ड कपबद्दल अंतिम निर्णय घ्या, BCCI चा ICC ला टोला
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

ऑस्ट्रेलियातील दुसरे सर्वात मोठे शहर मेलबर्नने (Melbourne) बुधवारी मध्यरात्रीपासून दुसर्‍या फेरीच्या लॉकडाउनला सुरुवात केली आहे. मेलबर्नच्या व्हिक्टोरियामध्ये कोरोना व्हायरसच्या (Victoria Coronavirus) प्रसारामुळे प्रशासनाने सहा आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आणि याने यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणारे टी-20 विश्वचषक (T20 World Cup) व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याची पुष्टी केली. आयसीसी (ICC) स्पर्धा पुढे ढकलण्याच्या घोषणेस दिरंगाई करीत असली तरी आता तरी परिस्थिती पाहून आयसीसी त्वरित निर्णय घेईल यासाठी बीसीसीआयला (BCCI) आशावादी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही झाला. तब्बल चार महिना आंतरराष्ट्रीय किंवा घरगुती क्रिकेटही ठप्प झाले होते. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये यंदा आयोजित होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम निर्णयाबाबत आयसीसी विलंब करत आहे. यावरून आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. ('टी-20 वर्ल्ड कपऐवजी आयपीएल आयोजित केल्यास प्रश्न उपस्थित केले जातील'; आयपीएल, टी-20 विश्वचषकाबाबत इंझमाम उल हकने केलं मोठं वक्तव्य)

ऑक्टोबर-नोव्हेंबर विंडोमध्ये टी-20 विश्वचषक आयोजित करण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा पुन्हा स्पष्ट केले मात्र आयसीसीने आयोजनाबाबत अधिकृत घोषणा केली नाही. "क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांनीही स्पर्धेचं आयोजन करणं शक्य नसल्याचं पत्राद्वारे लिहिलं होत, तरीही आयसीसी अंतिम निर्णय घेण्यासाठी इतका वेळ का लावतंय हे न समजण्यासारखं आहे,"   IANS शी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. “मेलबर्न लॉकडाउनमध्ये आहे या सद्य परिस्थितीमुळे, जबाबदार निर्णय घेण्याची काही संकल्पना असल्यास आयसीसीने या विषयावर खरोखरच अंतिम निर्णय घेतला पाहिजे," अधिकाऱ्याने पुढे म्हटले.

केवळ सीएचे अध्यक्ष एडिंग्जच नव्हे तर पीसीबी प्रमुख एहसान मनी यांनी देखील अलीकडेच माध्यमांना सांगितले की टी-20 वर्ल्डकप जैव-सुरक्षित वातावरणात होऊ शकत नाही. “आमच्यात बरीच चर्चा झाली आहे आणि अशी भावना आहे की (टी -20 वर्ल्ड कप) यावर्षी शक्य होणार नाही. 2021 आणि 2023 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित होणार आहे, आपल्याकडे एक वर्ष आहे जिथे आम्ही हा कार्यक्रम समायोजित करू शकतो. या स्पर्धेदरम्यान काही खेळाडू आजारी पडल्यास किंवा दुर्घटना घडल्यास त्याचा मोठा परिणाम होईल आणि क्रिकेट विश्वात भिती निर्माण होईल आणि आम्ही ती जोखीम घेऊ शकत नाही. इंग्लंडमध्ये पाकिस्तानसारख्या द्विपक्षीय मालिका जैव-बबल वातावरणात आयोजित करणे असणे शक्य आहे, परंतु 16 संघांचा सहभाग असतो तेव्हा ते फार अवघड असते," मनी म्हणाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2020 08:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).