IND vs SA 2nd Test: भारतात कसोटी सामना जिंकणे हे नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे, मात्र गेल्या वर्षभरात परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. २०२४ मध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाला त्यांच्याच मैदानावर ३-० ने पराभूत करून धक्का दिला होता. आता जागतिक कसोटी विजेता दक्षिण आफ्रिका संघही त्याच मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. कोलकाता कसोटी जिंकल्यानंतर, आता दक्षिण आफ्रिका गुवाहाटी कसोटीतही विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यातील विजयामुळे भारताचा मालिका क्लीन स्वीप होईल. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड (Shukri Conrad) यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात नवा वाद निर्माण झाला आहे.
"भारताला जमिनीवर रांगायला लावण्याची इच्छा"
गुवाहाटी कसोटीच्या चौथ्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव २६० धावांवर घोषित करून भारतासमोर ५४९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. आफ्रिकन संघाने दुसऱ्या सत्रापर्यंत मोठी आघाडी घेतली होती, तरीही त्यांनी शेवटच्या सत्रात थोडा जास्त वेळ फलंदाजी करून डाव घोषित केला.
Question - Why did South Africa declare so late?.
South Africa's Coach Shukri Conrad - "The series has been secured. We wanted India to really grovel". pic.twitter.com/Y0LoWvTwZa
— Tanuj (@ImTanujSingh) November 25, 2025
या निर्णयाबद्दल पत्रकार परिषदेत विचारले असता, प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी भारतीय संघाला मानसिकरित्या थकवण्याचा उद्देश स्पष्ट केला. मात्र, यावेळी त्यांनी एक असा शब्द वापरला ज्यामुळे खळबळ उडाली.
प्रशिक्षक कॉनराड म्हणाले:
"आम्हाला भारतीय संघाने मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवावा अशी आमची इच्छा होती. आम्हाला त्यांनी गुडघ्यावर बसावे (मी हा वाक्यांश चोरत आहे) अशी आमची इच्छा होती आणि आम्हाला सामना पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर काढायचा होता."
कॉनराड यांनी त्यांच्या वक्तव्याचे वर्णन करण्यासाठी "ग्रोव्हल" (Grovelling) या शब्दाचा वापर केला. 'ग्रोव्हल' म्हणजे जमिनीवर झोपणे, रांगणे किंवा अति नम्रता दाखवणे.
टोनी ग्रेगच्या १९७६ च्या विधानाची आठवण
कॉनराड यांच्या या विधानामुळे इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू टोनी ग्रेग यांच्या १९७६ मधील वादग्रस्त टिप्पणीची आठवण झाली, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान ग्रेगने कॅरिबियन क्रिकेट आणि त्यांच्या कृष्णवर्णीय लोकसंख्येचा अपमान करत म्हटले होते की, "आम्हाला त्यांनी ग्रोव्हल करावे अशी आमची इच्छा आहे."
टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर
गुवाहाटी कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या जवळ पोहोचली आहे. भारताला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी अजूनही ५२२ धावा करायच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ ८ विकेट्सची आवश्यकता आहे. पहिल्या डावात १८८ धावांची आघाडी घेतल्यानंतर, आफ्रिकेने दुसरा डाव २६०/५ वर घोषित केला. भारताने चौथ्या दिवसाच्या अखेरीस दोन विकेट्स गमावल्या. येथून सामना जिंकणे जवळजवळ अशक्य वाटते. दक्षिण आफ्रिका आधीच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता, भारतीय संघाचे ध्येय फक्त क्लीन स्वीप टाळणे असेल.