भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या विरोधात बर्ड फ्लूच्या (Bird flu) मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल गुरुवारी वाराणसीच्या (Varanasi) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर धवनने नुकतंच वाराणसीला भेट दिली जिथे तो नावेतून फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. यापैकी एका फोटोमध्ये तो पक्ष्यांना दाणे खायला घालताना दिसत होता ज्यामुळे आता त्याच्यावर संकट ओढवलं आहे. अधिवक्ता सिद्धार्थ श्रीवास्तव (Siddharth Srivastava) यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते, ज्यानंतर न्यायाधीश न्यायाधीश त्रिथ्या दिवाकर कुमार यांनी क्रिकेटपटूविरूद्ध तक्रार दाखल केली. न्यायालय 6 फेब्रुवारी रोजी या विषयावर चर्चा करेल आणि सुनावणी पुढे चालू ठेवू इच्छित आहे की नाही ते ठरवेल. आठवड्याच्या सुरूवातीस वाराणसीचे जिल्हा न्यायदंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी म्हटले होते की केवळ बोटीचा मालक या आरोपांना सामोरे जाईल आणि क्रिकेटपटूवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. (दिलासादायक! Bird Flu मुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदतीचा हात)
वाराणसी दौर्यावर असताना धवनने काशी विश्वनाथ आणि काल भैरव यांच्यासह अनेक मंदिरांमध्ये पूजा केली. या दरम्यान धवनने नावेतून गंगा प्रवासही केला. बनारसमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांना धान्य देण्यास बंदी घालण्यात आली आहे. “अशी काही माहिती मिळाली की काही नाविक लोक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करीत नाहीत आणि त्यांच्या बोटीवरील पर्यटक पक्ष्यांना खायला घालत आहेत. त्यामुळे या नौकाविहारांना ओळखले जात आहे आणि सामान्यत: पर्यटकांना अशा गोष्टींची माहिती नसते," राज शर्मा नंतर एएनआयला म्हणाले. या दरम्यान, धवनचे फोटो पाहताच जिल्हा प्रशासन प्रथम सक्रिय झाले ज्यानंतर शिखरने आपल्याला नियमांविषयी माहिती नसल्याचे प्रशासनाने मान्य केले. धवनला माहिती देणे हे नाविकांचे कर्तव्य होते आणि धवनला बोटीची यात्रा करावणाऱ्या खलाशांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. खलाशांच्या बोटीच्या संचालनावरही तीन दिवस बंदी घालण्यात आली होती.
View this post on Instagram
छत्तीसगड, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब - पोल्ट्री पक्ष्यांसाठी बर्ड फ्लू किंवा एव्हीयन इन्फ्लूएन्झाची 6 राज्यात आणि कावळ्या, स्थलांतर व वन्य पक्ष्यांची 10 राज्यात पुष्टी झाली आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासतीक मालिका विजयानंतर धवनने वाराणसी दौऱ्यावर गेला होता.