India to Host Men's Asia Cup 2025: 35 वर्षांनंतर... भारत 2025 मध्ये करणार आशिया कपचे आयोजन तर 2027 मध्ये 'या' देशात खेळवली जाणार स्पर्धा
Asia Cup 2025: भारताला 35 वर्षांनंतर आशिया चषकाचे यजमानपद मिळाले आहे. आशिया चषक 1990-91 मध्ये भारतात शेवटचा झाला होता, ही चौथी आवृत्ती होती. त्यानंतर कोलकात्यात श्रीलंकेचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले.
Asia Cup 2025: पुरुष आशिया चषक 2025 साली (Asia Cup 2025) भारतात होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) पुढील आवृत्तीचे यजमान हक्क भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दिले आहेत. पुढील वर्षी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. भारताला 35 वर्षांनंतर आशिया चषकाचे यजमानपद मिळाले आहे. आशिया चषक 1990-91 मध्ये भारतात शेवटचा झाला होता, ही चौथी आवृत्ती होती. त्यानंतर कोलकात्यात श्रीलंकेचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर 2027 मध्ये बांगलादेशच्या भूमीवर आशिया कप खेळवला जाणार आहे. आशिया चषक बांगलादेशमध्ये एकदिवसीय स्वरूपात होणार आहे. (हे देखील वाचा: Sri Lanka Win Women's Asia Cup 2024: श्रीलंकेने रचला इतिहास, भारताचा पराभव करुन प्रथमच महिला आशिया चषकाच्या विजेतेपदावर कोरले नाव)
India will be hosting their first men's Asia Cup in 34 years.
- 2025 Asia Cup in India. 🇮🇳 pic.twitter.com/IXs4NpkO6Q
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 29, 2024
विजेतेपदासाठी सहा संघ करतील स्पर्धा
एसीसीच्या निविदा दस्तऐवजानुसार, पुरुषांच्या आशिया कपच्या आगामी आवृत्तीत 13 सामने खेळवले जातील. स्पर्धेतील विजेतेपदासाठी सहा संघ (भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान) स्पर्धा करतील. सहाव्या संघाची निवड पात्रता स्पर्धेद्वारे केली जाईल. मात्र, भारतात आशिया चषक कधी आणि किती दिवस खेळवला जाईल, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. एसीसीच्या सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले जात आहे की ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होऊ शकते. दस्तऐवजात 2024, 2025, 2026 आणि 2027 मध्ये होणाऱ्या पुरुषांच्या अंडर-19 आशिया कपचाही उल्लेख आहे.
भारत आशिया कपचा गतविजेता
गतवर्षी भारताने श्रीलंकेचा 10 विकेट्सने पराभव करून ट्रॉफी जिंकली होती. गतवर्षी आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केले होते. वास्तविक, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत तर पाकिस्तानने काही सामने मायदेशात खेळले. 2027 पर्यंत भारताचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. भारत पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये इंग्लंडसोबत मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले आहे.
2027 पर्यंत भारताचे वेळापत्रक खूप व्यस्त
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. भारतीय खेळाडू मार्च ते मे या कालावधीत आयपीएल 2025 मध्ये व्यस्त असण्याची शक्यता आहे. टीम इंडिया जून आणि ऑगस्टमध्ये इंग्लंडचा दौरा करेल आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये तीन एकदिवसीय आणि तितके टी-20 सामने खेळेल. अशा परिस्थितीत आशिया चषक सप्टेंबरमध्ये न झाल्यास ऑक्टोबरमध्ये बांगलादेश मालिकेनंतर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेश मालिकेनंतर भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

