आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर-4 सामन्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आमनेसामने आले. गेल्या वेळी पाकिस्तानी गोलंदाजीसमोर तुटून पडलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी जोरदार पलटवार केला. गिल आणि रोहितने मिळून 13.2 षटकांत म्हणजे 80 चेंडूत शतकी सलामी दिली. यानंतर दोघांमध्ये 121 धावांची भागीदारी झाली. रोहित आणि गिलची तुफानी फलंदाजी पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर घाबरला आणि त्याने मोठे वक्तव्य केले. रोहित आणि गिल बाद झाल्यानंतर पावसाचे आगमन होईपर्यंत टीम इंडियाने 24.1 षटकांत 2 बाद 147 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाऊस पडला आणि सामना थांबवावा लागला. दरम्यान, आता शोएब अख्तरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात अख्तर म्हणाला की, 'पाकिस्तान पावसापासून वाचला'

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)