Bengaluru Bandh: कावेरीचा पाणी प्रश्न पुन्हा पेटला, अनेक संघटनांनी दिली बंगळूरु बंदची हाक
न्यायालयाच्या निर्देशानंतर तामिळनाडूला पाणी सोडण्यास सरकारसह स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याच कारणामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर कर्नाटक पोलिसांनी बंगळुरूच्या त्या भागात सुरक्षा उपाय कडक केले आहेत
कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात कर्नाटकात आंदोलने तीव्र झाली आहेत. याच्या निषेधार्थ आज अनेक संघटनांनी बंद पुकारला आहे. बंदमुळे मॅजेस्टिक बसस्थानकावर प्रवाशांची संख्या कमी दिसून येत आहे. तथापि, बीएमटीसीने सांगितले की बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे सर्व मार्ग नेहमीप्रमाणे चालू राहतील. कावेरी पाण्याच्या प्रश्नावर बंदला ऑटोचालकांचाही पाठिंबा मिळाला आहे. (हेही वाचा - Home Loan: मोदी सरकारचा मोठा निर्णय! घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार स्वस्तात गृहकर्ज, वाचा सविस्तर)
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूला पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर तामिळनाडूला पाणी सोडण्यास सरकारसह स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याच कारणामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर कर्नाटक पोलिसांनी बंगळुरूच्या त्या भागात सुरक्षा उपाय कडक केले आहेत, जिथे मोठ्या संख्येने तामिळ भाषिक लोक राहतात.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Karnataka: Less number of passengers seen at Majestic Bus Station, Bengaluru because of the Bandh called by various organizations regarding the Cauvery water issue. pic.twitter.com/2LsqxAAHO9
— ANI (@ANI) September 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2023 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

