Chikungunya And Dengue Cases In Mumbai: मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ, गेल्या 21 दिवसांत रुग्णसंख्या झाली तिप्पट

मुंबईत मलेरिया (Malaria), डेंग्यू (dengue), गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या (chikungunya) रुग्णांची संख्या वाढत आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत आहेत, तर दुसरीकडे इतर आजारांमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Chikungunya And Dengue Cases In Mumbai: मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ, गेल्या 21 दिवसांत रुग्णसंख्या झाली तिप्पट
Dengue | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईत मलेरिया (Malaria), डेंग्यू (dengue), गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या (chikungunya) रुग्णांची संख्या वाढत आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत आहेत, तर दुसरीकडे इतर आजारांमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 21 दिवसांत मुंबईत मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. मुंबईत 1 ते 21 नोव्हेंबर दरम्यान मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची आकडेवारी पाहिली तर मलेरियाचे 234 रुग्ण आढळून आले आहेत. या कालावधीत डेंग्यूचे 91, गॅस्ट्रोचे 200 रुग्ण, चिकनगुनियाचे 12, लेप्टोस्पायरोसिसचे 6 आणि स्वाइन फ्लूचे एक रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबईतील जनता गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. मुंबई महानगरपालिकेने कठोर नियमांचे पालन करून कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट वाढण्यापासून रोखले. तर संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठीही पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. मुंबईत सध्या कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण आले असले तरी पावसाळ्याशी संबंधित आजारांचा उद्रेक होताना दिसत आहे. हेही वाचा Navi Mumbai: कोरोना चाचणीला नकार दिल्याने नेरळ पोलिसांनी एका व्यक्तीला केली अटक

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाला पराभूत करण्यासाठी जशी खबरदारी घेतली तशीच या आजारांवरही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.  पावसाळ्यातील वाढत्या आजारांबाबत डॉ.गौतम पुरोहित म्हणाले की, पावसाळ्यातील आजार डासांमुळे पसरतात. अशा ठिकाणी जेथे पाणी साचते आणि जेथे स्वच्छता केली जात नाही तेथे डासांची संख्या वाढते. लोकांनी फळे आणि ताज्या भाज्या खाताना स्वच्छता राखली पाहिजे. लोकांना ताप आल्यास त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2021 10:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).