Accident On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग बनत आहे मृत्यूचा सापळा; गेल्या चार महिन्यांत 253 अपघात; 28 जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर नुकत्याचं झालेल्या अपघातात हरियाणाच्या महिला पोलीस निरीक्षक नेहा चौहान यांचा मृत्यू झाला. 29 एप्रिल रोजी त्यांची टीम मराठवाडा विभागातील परभणी येथून परत येत असताना त्यांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.
Accident On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) म्हणजेच नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Nagpur Expressway) मृत्यूचा सापळा बनताना दिसत आहे. हा महामार्ग सुरू झाल्यापासून चार महिन्यांत 253 रस्ते अपघात झाले आहेत. ज्यात 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. समृद्धी महामार्गावर नुकत्याचं झालेल्या अपघातात हरियाणाच्या महिला पोलीस निरीक्षक नेहा चौहान यांचा मृत्यू झाला. 29 एप्रिल रोजी त्यांची टीम मराठवाडा विभागातील परभणी येथून परत येत असताना त्यांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.
महाराष्ट्रातील अतिरिक्त महासंचालक (ADG) वाहतूक कार्यालयाने ही माहिती शहर-आधारित माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांना दिली. रस्ता घाईघाईने आणि योग्य नियोजनाशिवाय बांधण्यात आला आहे, असा आरोप कार्यकर्त्याने केला आहे. नागपूरस्थित विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात महामार्गावरील जीवघेण्या अपघातांची चार प्रमुख कारणे आढळून आली. यामध्ये टायर फुटणे, लेन बदलणे, मोनोटोनस ड्रायव्हिंग आणि रस्त्यावर प्राणी ओलांडणे यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Mumbai: सोशल मीडियावरील तक्रारींनंतर बोरिवली आणि वांद्रे भागात रहदारीच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या 200 हून अधिक ऑटो-रिक्षा चालकावर कारवाई)
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अपघातांमागे रॅश ड्रायव्हिंग, ओव्हर स्पीड, प्रवासी ओव्हरलोड करणे आणि झोप लागणे ही काही प्रमुख कारणे आहेत.
अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना -
अपघातांच्या उच्च दराला प्रतिसाद म्हणून, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अपघात कमी करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना राबविण्याची योजना जाहीर केली आहे. आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले की, अलिकडच्या आठवड्यात झालेल्या अपघातांच्या घटनांनंतर आम्ही चुकीच्या वाहनचालकांवर मागील महिन्यात कारवाई सुरू केली आहे आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 1000 वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. सुमारे 550 वाहनांचे टायर जीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर परिसरात ताशी 120 किमीची वेग मर्यादा ओलांडली गेली होती, जिथे सुमारे 30 चालक ओव्हरस्पीडिंग करताना पकडले गेले. नागपूरमध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 25 तर औरंगाबादमध्ये 15 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 08, 2023 12:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

