Mumbai: सोशल मीडियावरील तक्रारींनंतर बोरिवली आणि वांद्रे भागात रहदारीच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या 200 हून अधिक ऑटो-रिक्षा चालकावर कारवाई
Auto Rickshaw (Photo Credits: PTI)

Mumbai: ऑटो-रिक्षा चालकांविषयी (Auto Rickshaw Drivers) सोशल मीडियावर अनेक तक्रारींनंतर मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) 1 मे ते 5 मे दरम्यान 257 रिक्षा चालकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या वाहनचालकांना बोरिवली आणि वांद्रे प्रदेशातील रहदारीच्या निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा झाली. 257 पैकी 221 ड्रायव्हर्सना बोरिवली येथे, विशेषत: रेल्वे स्टेशनच्या आवारात दंड ठोठावण्यात आला.

तथापी, सुमारे 170 रिक्षा चालकांना भाडे नाकारल्याबद्दल, चुकीच्या बाजूच्या ड्रायव्हिंगसाठी नऊ, नॉन पार्किंग झोनमध्ये पार्किंगसाठी सहा, एकाला परवान्याशिवाय वाहन चालविण्याकरिता दंड ठोठावण्यात आला. (हेही वाचा - Road Accident in Maharashtra: ड्रायव्हिंग लायसन्स देताना योग्य तत्परतेचा अभाव आणि कायद्याच्या अपुऱ्या अंमलबजावणीमुळे वाढत आहे रस्ते अपघात; तज्ञांनी व्यक्त केली चिंता)

त्याचप्रमाणे, वांद्रे रेल्वे स्टेशनच्या परिसराच्या बाहेर, ट्रॅफिक पोलिसांनी ऑटो स्टँडच्या बाहेर पार्किंगसाठी सात वाहन चालकांना, झोन 16 मध्ये प्रवेश करण्यासाठी नऊ जणांना आणि नॉन पार्किंग झोनमध्ये पार्किंगसाठी आणखी तीन जणांनावर कारवाई केली. (हेही वाचा - Mumbai: 15,000 झाडांवर कायमस्वरूपी LED दिवे बसवण्याच्या बीएमसीच्या निर्णयावर पर्यावरणवादी नाराज)

प्राप्त आकडेवारीनुसार, 1 एप्रिल ते 4 मे दरम्यान ओपेरा जंक्शन ते अल्कर हाऊस पर्यंत एसव्हीपी रोड (गिरगाव) मध्ये 1,357 वाहनांना दंड आकारण्यात आला आहे. रहदारी पोलिसांनी प्रथमच ट्विटरवर यासंदर्भात आकडेवारी जारी केली आहे. हा डेटा व्हायरल करणं हे आमचं उद्दीष्ट म्हणजे रहदारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या परिणामाबद्दल लोकांना जागरूक करणे हा आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.