Maharashtra Krishi Din 2022: महाराष्ट्र कृषी दिन कधी आहे?  हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
Maharashtra Krishi Din 2022 (File Image)

Maharashtra Krishi Din 2022: महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून गणले जाते. कारण भारत अनेक उत्पादनांसाठी या राज्यावर अवलंबून आहे. गरिबी पावसाअभावी दुष्काळ, वाढती महागाई यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत असून, दरवर्षी अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषी दिवस एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

या दिवशी शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. त्यासोबतच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव केला जातो. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या कृषी दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊयात...

महाराष्ट्र कृषी दिनाचा इतिहास -

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मरणदिनी महाराष्ट्र कृषी दिन किंवा महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनकही म्हटले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करून त्यांच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण केले जाते. वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी झाला. 1963 ते 1975 या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. या कालावधीपर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्त्व -

महाराष्ट्रात कृषी दिनाला विशेष महत्त्व आहे, कारण वसंतराव नाईक यांनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुमोल सेवा दिली. या दिवशी राज्यभरात अनेक उत्सवांचे आयोजन केले जाते. भारतीय टपाल विभागाने शेत, शेतकरी आणि शेतातील प्राणी या थीमवर अनेक टपाल तिकिटे जारी केली आहेत.

हा दिवस महत्त्वाचा आहे कारण हा दिवस राज्यातील शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. कृषी दिन शेतक-यांच्या दुर्दशेबद्दल मदत आणि जागरुकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकतो.