Babasaheb Ambedkar Quotes In Marathi: आंबेडकर जयंती निमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर करा बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार
आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. दरवर्षी देशभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आंबेडकरांनी सांगितलेले विचार आजही सर्वांना प्रेरणा देतात. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार Images, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर करून तुम्ही त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.
Babasaheb Ambedkar Quotes In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. बाबासाहेब आंबेडकर हे प्रख्यात कायदेतज्ज्ञ, बौद्ध कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, वक्ते, लेखक, अर्थशास्त्रज्ञ, विद्वान आणि संपादक होते. बाबासाहेबांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना 1990 मध्ये, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला. (वाचा - Babasaheb Ambedkar Jayanti Bhashan Marathi 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दमदार भाषणांचा आजही जगात डंका, पाहा व्हिडिओ)
आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. दरवर्षी देशभरात त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आंबेडकरांनी सांगितलेले विचार आजही सर्वांना प्रेरणा देतात. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार Images, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर करून तुम्ही त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता. (वाचा -Dr. Bhimrao Ambedkar Jayanti 2024: डॉ.आंबेडकर जयंतीची तारीख, महत्व आणि इतर रंजक गोष्टी, जाणून घ्या)
ज्याचे मन मुक्त नाही, जरी तो तुरुंगात नसला तरी तो कैदी आहे आणि मुक्त मनुष्य नाही.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
धर्म हे कर्तव्याचे दुसरे नाव आहे. जर आपण आपली जबाबदारी आणि कर्तव्ये पूर्ण निष्ठेने पार पाडली तर आपण खऱ्या अर्थाने धार्मिक आहोत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आपण स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या हक्कांसाठी शक्य तितके लढले पाहिजे. त्यामुळे तुमचे आंदोलन सुरू ठेवा आणि तुमचे सैन्य संघटित करा. सत्ता आणि प्रतिष्ठा संघर्षातूनच तुमच्याकडे येईल.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
न्याय्य समाज म्हणजे तो समाज ज्यामध्ये चढत्या श्रद्धेची भावना आणि अवरोहाची उतरती भावना, एक करुणामय समाजाच्या निर्मितीमध्ये विरघळली जाते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
परदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. त्यांनी भारताचा प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणुकीवर भर दिला. आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पुरस्कार केला. तसेच शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, सामुदायिक आरोग्य, निवासी सुविधा या मूलभूत सुविधांवर जोर दिला.
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2024 10:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

