Dead Lizard And Mosquitoes Found In Ghee: तेलंगणातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. शनिवारी करण्यात आलेल्या तपासणीत, राज्यस्तरीय टास्क फोर्स टीमने (State-level Task Force Team) जनगाव जिल्ह्यातील (Jangaon District) रघुनाथपल्ली मंडळातील (Raghunathpally Mandal) शक्ती दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये (Shakti Milk and Milk Products) अनेक गंभीर उल्लंघने आढळून आली आहेत. तेलंगणाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी अहवाल दिला की, अन्न हाताळणाऱ्या प्रक्रिया दरम्यान पुरेसे स्वच्छताविषयक उपायांचे पालन होत नव्हते. तपासणीत संरचनात्मक समस्या उघडकीस आल्या आहेत. यात साठवलेल्या तुपात घरमाश्या आणि डास (Mosquitoes) असल्याचे आढळून आले. याशिवाय, अन्नपदार्थांजवळ एक मृत पाल (Dead Lizard) आढळून आली. तसेच छतावर कोळ्याचे जाळे आढळून आले.
पॅकिंग केलेल्या उत्पादनांवरील लेबलिंगमध्ये दोष -
तथापी, यावेळी पथकाला कीटक नियंत्रण नोंदी, अस्वच्छ आणि गंजलेले उपकरणे आणि कच्च्या अन्नपदार्थांची अव्यवस्थित साठवणूक असल्याचे आढळून आले. याशिवाय, पॅकेज केलेल्या उत्पादनांवर लेबलिंगमध्ये दोष देखील आढळून आला. परिणामी, दूषितता, बुरशीजन्य प्रादुर्भाव यामुळे 720 किलो दही टाकून देण्यात आले. याव्यतिरिक्त, लेबलिंग उल्लंघन आणि निकृष्ट दर्जाच्या संशयावरून 1700 किलो दही जप्त करण्यात आले. प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी डेअरीतील नमुने गोळा करण्यात आले आहेत. पुढील कारवाई अन्न सुरक्षा आणि मानके (FSS) कायदा, 2006 आणि FSS नियम आणि नियम, 2011 नुसार केली जाईल. (हेही वाचा - Dead Lizard Found in School’s Midday Meal in Odisha: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शाळेच्या मध्यान्ह भोजनात सापडली मृत पाल; 100 विद्यार्थी आजारी)
अन्न सुरक्षा आयुक्तांच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आलेली पोस्ट पहा -
State level Task Force team has conducted inspections at the below establishment in Jangaon district on 01.02.2025.
𝗦𝗵𝗮𝗸𝘁𝗶 𝗠𝗶𝗹𝗸 𝗮𝗻𝗱 𝗠𝗶𝗹𝗸 𝗣𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝘀, 𝗥𝗮𝗴𝗵𝘂𝗻𝗮𝘁𝗵𝗽𝗮𝗹𝗹𝘆 (𝗠), 𝗝𝗮𝗻𝗴𝗮𝗼𝗻
* Food handlers were not following adequate sanitary… pic.twitter.com/xyOFiH9rt7
— Commissioner of Food Safety, Telangana (@cfs_telangana) February 1, 2025
या फोटोनंतर अनेकांनी दुषित अन्न पदार्थांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, जुन्या शहरात असे अनेक कारखाने आहेत जिथे तपासणी पथक कधीही प्रवेश करण्याचे धाडस करत नाही. दुसऱ्याने एका यूजरने म्हटलं आहे की, सरकार कारखान्याला कायमचे का सील करत नाही....आणि परवाना रद्द का करत नाही. (हेही वाचा -Hyderabad Shocker: किळसवाणा प्रकार! चिकण बिर्याणीत आढळली पाल, व्हिडिओ आला समोर)
आणखी एकाने म्हटलं आहे की, 'आपण भारतीय छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही... आता, हे सर्व बनावट अन्न खाल्ल्यानंतर, आपल्या पोटालाही त्याची सवय झाली आहे... आपण काय करू शकतो? सरकार अशा लोकांना कठोर शिक्षा देत नाही. आपणच त्रास सहन करतो. सर्वांना पैसे मिळत आहेत.'