
Nita Ambani On International Women's Day: रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी (Nita Ambani) यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women's Day 2025) त्यांच्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे. त्यांनी सर्व वयोगटातील महिलांना आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. महिला दिनानिमित्त, निता अंबानी यांनी त्यांचा जिममध्ये कसरत करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी यांनी सांगितलं की, मी आठवड्यातून 5 ते 6 दिवस कसरत करते. महिलांनी दरदोज योगासने आणि कोअर स्ट्रेंथ एक्सरसाइज केले पाहिजेत. गतिशीलता आणि लवचिकता दोन्ही शरीराच्या हालचालींशी संबंधित आहेत, परंतु त्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. गतिशीलता म्हणजे सांधे पूर्णपणे सक्रियपणे हलविण्याची क्षमता, तर लवचिकता म्हणजे स्नायू आणि संयोजी ऊतींची निष्क्रियपणे ताणण्याची क्षमता.
नीता अंबानींनी दिला खास सल्ला -
नीता अंबानी यांनी म्हटलं आहे की, महिला नेहमीच स्वतःला सर्वात शेवटी ठेवतात. वयाच्या 30 व्या वर्षानंतर, महिलांना दर दशकात 3 ते 8 % स्नायूंचे वजन कमी होऊ लागते आणि वयानुसार हे प्रमाण वाढते. कालांतराने आपल्या शरीरात अनेक बदल होतात. आपल्या शरीराची शक्ती हळूहळू कमी होऊ लागते. आपला चयापचय आणि सहनशक्ती कालांतराने कमी होऊ लागते. म्हणूनच, महिलांनी स्वतःची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे बनते. पौष्टिक आहार तक्त्यासोबतच आपण व्यायामाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असं आवाहनही नीता अंबानी यांनी केलं आहे. (हेही वाचा -Nita Ambani Re-elected as IOC Member: नीता अंबानी यांची आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा एकदा निवड)
Unstoppable at 61! This International Women’s Day, Mrs. Nita Ambani shares her inspiring fitness journey and invites women of all ages to prioritize their health and wellbeing. With her dedicated workout routine, she shows us that age is just a number. Join the #StrongHERMovement… pic.twitter.com/CyhfT1zm9r
— Reliance Industries Limited (@RIL_Updates) March 8, 2025
व्यायामाचे अनेक फायदे - नीता अंबानी
नीता अंबानी यांनी म्हटलं आहे की, नियमित व्यायामामुळे वजन कमी होते आणि निरोगी वजन राखण्यास मदत होते. हृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि कर्करोग यासारख्या अनेक आजारांचा धोका कमी होतो. व्यायामामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. स्नायू आणि हाडे मजबूत होतात. ऊर्जेची पातळी वाढते. सहनशक्ती वाढते. व्यायामामुळे मानसिक आरोग्य मजबूत होते. चिंता कमी होते आणि मन व्यस्त राहते. व्यायामामुळे आत्मविश्वास वाढतो.