
ICC T20 World Cup 2024 Final: भारतीय क्रिकेट संघाने 29 जून 2024 या दिवशी इतिहास रचला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जिंकत भारतीय क्रिकेटसाठी एक सुवर्णक्षण निर्माण केला. 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटच्या 30 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज होती आणि त्यांच्याकडे 6 विकेट्स उरल्या होत्या. परंतु भारतीय गोलंदाजांनी कमाल कामगिरी करत सामना फिरवला आणि भारताने अंतिम सामना 7 धावांनी जिंकून ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
रोहित शर्माचा ICC ट्रॉफीतील ऐतिहासिक रेकॉर्ड
ही रोहित शर्माची कर्णधार म्हणून पहिली आयसीसी ट्रॉफी होती. भारताने 13 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकत आपल्या क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले. याच वर्षी, भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये न्यूझीलंडचा पराभव करत दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. यासह, रोहित शर्माच्या खात्यात कर्णधार म्हणून दोन आयसीसी ट्रॉफ्या जमा झाल्या.
🚨 18 YEARS OF ROHIT SHARMA IN INTERNATIONAL CRICKET
- 19700 Runs.
- 49 Hundreds.
- 42.18 Average.
- 637 Sixes.
- 44 POTM awards.
- 9 POTS awards.
- 2 ICC Trophy winning Captain.#ShubmanGill #YashasviJasiwal #ViratKohli #KLRahul #INDvsENG #RishabhPant pic.twitter.com/bExoQAomgT
— Monish (@Monish09cric) June 23, 2025
एकूण चार आयसीसी ट्रॉफ्या जिंकणारा रोहित शर्मा हा भारताच्या क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी खेळाडू आहे. 2007 टी-20 वर्ल्ड कप (धोनी नेतृत्वाखाली), 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2024 टी-20 वर्ल्ड कप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी या चार स्पर्धांमध्ये त्याने विजयी संघाचा भाग म्हणून योगदान दिले आहे.
कर्णधार म्हणून रोहित शर्मा – आकडेवारीवर नजर
-
एकूण सामने: 142
-
विजयी सामने: 103
-
पराभव: 33
-
विजयाचा टक्का: 72.53%
एकदिवसीय सामने: 56 पैकी 42 विजय
टी-20 सामने: 62 पैकी 49 विजय
कसोटी सामने: 24 पैकी 12 विजय
सध्या रोहित शर्माने कसोटी व टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला असून तो केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे.
आशिया कपमध्ये रोहित शर्माची कर्णधार म्हणून कामगिरी
रोहित शर्माने आशिया कपमध्येही भारताला दोनदा (2018-2023) जेतेपद मिळवून दिले आहे. याशिवाय, तो 2008,2010 आणि 2016 मध्येही विजयी संघाचा भाग होता. रोहित शर्माचे नेतृत्व हे भारतीय क्रिकेटसाठी वरदान ठरले आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी व आशिया स्पर्धांमध्ये केलेली कामगिरी ही प्रेरणादायक असून तो भविष्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील.