IND vs ENG 4th Test 2021: टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, म्हणाले- ‘तीन दिवसांत संपणार चौथी अहमदाबाद टेस्ट’
भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याबाबत माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. चौथ्या अहमदाबाद टेस्ट सामना पाच दिवस चालणार नाही, असे गावस्कर यांनी सांगितले. हा सामना तिसर्या दिवशी किंवा चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच संपेल, असे गावस्कर म्हणाले.
IND vs ENG 4th Test Day 2: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात अहमदाबाद येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याबाबत माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. चौथ्या अहमदाबाद टेस्ट (Ahmedabad Test) सामना पाच दिवस चालणार नाही, असे गावस्कर यांनी सांगितले. हा सामना तिसर्या दिवशी किंवा चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच संपेल, असे गावस्कर म्हणाले. कमेंट्री दरम्यान, हरभजन सिंहने गावस्कर यांना सामन्याबद्दल विचारले असता लिटिल-मास्टर म्हणाले की, इंग्लिश फलंदाज ज्या प्रकारे भारतीय गोलंदाजांना खेळत आहेत, ते पाहून सामना पाच दिवस चालणार असे दिसत नाही. गावस्कर म्हणाले की, हा सामना तिसर्या दिवसाच्या किंवा चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संपेल. शेवटच्या दोन सामन्यात खेळपट्टीला दोष देत इंग्लंडच्या खराब फलंदाजीबद्दल बोलले गेले नाही, परंतु यावेळी पुन्हा इंग्लिश फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यास अपयशी ठरले. (IND vs ENG 4th Test 2021: Rishabh Pant याची जिम्नॅस्ट स्टाईल उडी पाहून Virat Kohli ही झाला हैराण, दिली अशी प्रतिक्रिया Watch Video)
अहमदाबाद टेस्टच्या पहिल्या डावात इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर संपुष्टात आला. यावेळी खेळपट्टीवर विशेष मदत मिळाली नाही आणि फलंदाज त्यावर फलंदाजीचा आनंद घेऊ शकत होते. इंग्लिश संघ पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकला मात्र, भारतीय संघानेही शुभमन गिलची पहिली विकेट गमावली. इंग्लंड संघाने सुरुवातीपासून नियमित अंतराने विकेट गमावत राहिले. भारतीय गोलंदाजांनी युनिट म्हणून एकत्र काम केले आणि इंग्लंडच्या फलंदाजांना तग धरून खेळण्याची संधी दिली नाही. बेन स्टोक्सने नक्कीच अर्धशतक झळकावले होते, परंतु इतर फलंदाजांकडून कोणतीही महत्त्वपूर्ण योगदान मिळाले नाही ज्यामुळे संघ यंदाही पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला. दुसरीकडे, पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने देखील सुरुवातीच्या ओव्हरमध्ये शुभमन गिलची विकेट गमावली. गिलच्या खराब कामगिरीचे सत्र यंदाही सुरूच राहिले ज्यामुळे संघात त्याच्या स्थानाबद्दलही प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
दुसरीकडे, इंग्लंडसाठी स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या तर डॅन लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. टीम इंडिया फिरकीपटूंची जादू यादी कायम राहिली. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 गडी बाद केले तर ज्येष्ठ अनुभवी रविचंद्रन अश्विनने 3 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. दोन्ही संघातील चार सामन्यांच्या मालिकेत यजमान भारतीय संघ सध्या 2-1ने आघाडीवर आहे. सामन्यात विजय किंवा ड्रॉ टीम इंडियाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट मिळवून देईल.
(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2021 10:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

