Maharashtra Assembly Monsoon Session 2022: कोकणवासियांचा प्रवास होणार सुकर; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानसभेत दिली 3 महत्त्वाची आश्वासनं
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे 25 ऑगस्टपर्यंत बुजवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
कोकणात जाणार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र पावसाळी विधिमंडळ अधिवेशनामध्ये आज राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत 3 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे 25 ऑगस्टपर्यंत बुजवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सोबतच बहुप्रतिक्षित गोवा महामार्ग पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याची आणि परशुराम घाटातील रस्त्याची समस्या मे २०२३ पर्यंत दूर करणार असल्याची माहिती दिली आहे.
पहा ट्वीट
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिलेली आश्वासने
- गोवा महामार्ग पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करणार
- परशुराम घाटातील रस्त्याची समस्या मे २०२३ पर्यंत दूर करणार @MahaDGIPR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2022 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

