Shiv Sena On WB Assembly Election 2021: ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले; पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवर शिवसेना मुखपत्रातून भाष्य
Mamata Banerjee | ( Photo Credits: Twitter)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 (West Bengal Assembly Election 2021) प्रचारादरम्यान तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) या दोन पक्षात जे काही सुरु आहे त्यावरुन शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Saamana Editorial) संपादकीयातून सडकून टीका करण्यात आली आहे. त्याबरोबरच ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे कौतुक करत ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले, असा टोला लगावण्यात आला आहे. 'ममतांना प्लास्टर; भाजपला दुखणं!' या मथळ्याखाली लिहीलेल्या लेखात ही टीका करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे सामना संपादकीयात"

''नंदीग्राममध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री मंमता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होत असते. त्यामळे ममतांची जखम त्यांच्या विरोधकांना जास्तच भारी पडणार आहे. ममता या नंदीग्राम येथून निवडणूक लढत आहेत. त्या नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या. त्यानंतर प्रचाराच्या दरम्यान विरुलिया येथे मंदिरासमोर त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबला. कारच्या बाहेर उतरुन त्या देवाला नमस्कार करत असताना चार-पाच लोक अचानक धावत आले आणि त्यांनी गरज नसताना दरवाजा ढकलून ममतांना जखमी केले. ममता यांच्या पायास मोठी दुखापत झाली. त्यांचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. हा अपघात नसून विरोधकांनी जाणूनबुजून केलेला हल्ला आहे, असे ममता म्हणत आहेत तर लोकांची सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. या अपघाताची सीबीआय चौकशी करा अशी मागणी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली. ममतांच्या पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खरेच. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी. आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सर्वात मोठा विनोद म्हावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भाजपच्या किमान दाह-वीस जागा नक्कीच जखमी करु शकते.''

''भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा एरएक प्रयत्न सुरु आहे. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे. तरीही ममतांचा प. बंगालमधील जोर कायम आहे. प. बंगालातील लढाईल ही ममता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी झाली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष प. बंगालात काय घडतेय याकडेच लागले आहे. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात 'माहोल' गरम केला आहे. प्रत्येक निवडणूक ते असाच माहोल निर्माण करुन जिंकत असतात. असाच माहोल निर्माण करुन भाजपने प. बंगालातील लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या. हे यश मानावेच लागेल. 18 लोकसभा मददारसंघातमधील हे यश म्हणजे साधारण 120 विधानसभा जागांवर भाजपास चढाई मिळाली, असे मानले तरी विधानसभेची लढाई वेगळीआहे. प. बंगाल निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा मुद्दा काय? तर ममता बॅनर्जी या 'जय श्रीराम' म्हणत नाहीत. त्यांच्या राजवटीत 'जय श्रीराम' म्हणायला बंदी आहे. ममता त्यांची प्रतिमा हिंदूविरोधी बनवून भाजप प. बंगालात मते मागत आहे. यावर ममतांनी सांगितले, '''मी ब्राह्मण आहे. धर्माचं राजकारण करु नका. मला हिंदू धर्म शिकवू नका.'' नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ममता रेया पाडा येथील 1000 वर्षे जुन्या महारुद्र सिद्धनात मंदिरात गेल्या. तेथे पूजा केली. 'जय श्रीराम'ला ममतांचा विरोध आहे, असा प्रचार करणाऱ्यांना उत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभेत 'चंडी पाठ' म्हणून दाखवले. प. बंगालची निवडणूक अशा धार्मिक पातळीवर नेऊन ठेवण्याचे श्रेय भारतीय जनता पक्षालाच द्यावे लागेल. प. बंगालसारख्या मोठ्या राज्याची निवडणूक जय श्रीराम, चंडी पाठ, ममतांच्या पायांचे प्लॅस्टर या भोवतीच फिरत आहे. हे आपल्या लोकशाहीचे विद्रुपीकरण आहे. ममतांच्या पायास जखम झाली. आता त्याच अवस्थेत लंगडत किंवा हातात कुबड्या घेऊन कार्यकर्त्यांच्या आधाराने ममता बॅनर्जी प्रचार करतील व सहानुभूती मिळवतील याची भाती भाजपला वाटत असेल तर भाजप हा तकलादू मुद्द्यांवर प. बंगालच्या मादानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात. अश्रूंचा बांध फुटतो, ते बरे चालते. पण ममतांच्या पायास जखम झाी हा मात्र लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न. आपल्या निवडणुका आता खोटेपणा व साहनुभूती या दोन शस्त्रांनीच लढल्या जातात. प. बंगालात दोन्ही बाजूंनीच शस्त्रास्त्रांचा खणखणाट सुु आहे. फक्त फरक असा की, भारतीय जनता पक्षाला तेथे तोडीस तोड उत्तर मिळत आहे.''