मुख्यमंत्री शपथविधी होता की दशक्रियाविधी? संजय राऊत यांचा उपरोधिक सवाल
Sanjay Raut Reaction (PC - Twitter)

राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री पदी अजित पवार (Ajit Pawar) यांचा शपथविधी आज सकाळी-सकाळी पार पडला. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र उचललं. मुख्यमंत्री शपथविधी होता की...? दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी आटोपला, असा उपरोधिक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (हेही वाचा - अजित पवार यांना जनता रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही; मुख्यमंत्री पदाचा शपथविधी म्हणजे रात्रीच्या वेळेतील व्यभिचार: संजय राऊत)

संजय राऊत ट्विट - 

 दरम्यान, सकाळी झालेल्या या निर्णयावर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली होती. काल रात्री नऊ वाजेपर्यंत अजित पवार आमच्या सोबत बैठकीत उपस्थित होते. परंतु, त्यांच्या हालचाली आणि झुकलेल्या नजरा या संशयास्पद होत्या. स्वतः शरद पवार त्यांच्या या कृत्याने चिंतीत होते. बैठकीनंतर एकाएकी अजित पवार गायब झाले आणि त्यांचा काहीही संपर्क होत नव्हता. सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजले. याबाबत शिवसेनेला किंवा खुद्द राष्ट्रवादीला सुद्धा माहिती नव्हती. त्यामुळे अजित पवार यांनी केलेले हे कृत्य रात्रीच्या वेळेत घडलेला व्यभिचार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळिमा फसला आहे. त्यांना महाराष्ट्राची जनता रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही, अशा कठोर शब्दात राऊत यांनी अजित पवारांवर तोफ दागली होती.

 

संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या प्रतिक्रियेत 'आम्ही बिनधास्त असल्याचं म्हटलं होत. यात त्यांनी बाळासाहेबांचा फोटो शेअर करत, संघर्षाचा काळ कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संघर्षातून दिसतीय ती शिवसेना उभी राहिली, संघर्षातूनच ती पूढे जाईल.