
महाराष्ट्रात कोविड-19 (Covid-19) च्या नव्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे येथे नवे रुग्ण आढळून आले असून, काही मृत्यूंची नोंद झाल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची बातमी समोर आली आहे, तर पुण्यात यंदाच्या वर्षातील पहिला रुग्ण आढळला. वैद्यकीय तज्ञांनी सांगितले की, आतापर्यंत नोंदवलेले रुग्ण सौम्य आहेत आणि 2020 ते 2022 दरम्यान जगाला व्यापलेल्या प्राणघातक लाटांशी त्यांची तुलना करता येणार नाही. कोविड-19 बाबत राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही.
पुणे शहरात या वर्षीचा पहिला कोविड रुग्ण आढळला आहे. पुण्यातील एका 87 वर्षीय वृद्धाला कोविड-19 ची लागण झाली असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घाबरून जाण्याची गरज नाही, कारण कालांतराने विषाणूंची तीव्रता कमी होते. दुसरीकडे हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या शहरांमध्ये रुग्णसंख्या, रुग्णालयात दाखल होणे आणि अगदी मृत्यूंमध्येही मोठी वाढ दिसून येत आहे, जी जवळजवळ एका वर्षात पहिली मोठी वाढ आहे. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने अंदाजे कोविड प्रकरणांमध्ये 28 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.
Covid-19 Cases:
Recent media reports have highlighted increase in COVID-19 cases in Singapore and Hong Kong in the last few weeks. As per the preliminary information available, the cases are mostly mild, not associated with unusual severity or mortality: Official Sources
In light of these…
— ANI (@ANI) May 19, 2025
अहवालानुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या सुमारे 14,200 वर पोहोचली आहे. त्याच काळात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही 30 टक्क्यांनी वाढले आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, ही प्रकरणे बहुतेक सौम्य आहेत, असामान्य तीव्रता किंवा मृत्युदराशी संबंधित नाहीत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), आपत्कालीन वैद्यकीय मदत (EMR) विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ज्ञांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. (हेही वाचा: COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण)
या बैठकीत असा निष्कर्ष काढण्यात आला की, भारतातील सध्याची कोविड-19 परिस्थिती नियंत्रणात आहे. 19 मे 2025 पर्यंत, भारतात सक्रिय कोविड-19 प्रकरणांची संख्या 257 आहे, जी देशाच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता खूपच कमी आहे. यापैकी जवळजवळ सर्व प्रकरणे सौम्य आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) आणि आयसीएमआरद्वारे देशात कोविड-19 सह श्वसन विषाणूजन्य आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी एक मजबूत प्रणाली देखील अस्तित्वात आहे.