सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात 27 घरांची पडझड झाली असून, पुढील चार तासांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मुंबई - पुणे रेल्वेमार्गावर दरड कोसळली; ठाकूरवाडी - मंकी हिल दरम्यानची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे च्या, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दुपारी सव्वातीन वाजता ठाकुरवाडी- मंकी हिल दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प 

कल्याण: मलंगगडमध्ये पूर परिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

खारघर येथील पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्यानं सायन-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. सायन सारख्या सखल भागामध्ये पाणी साचून राहिल्याने अनेक वाहनं अडकून पडल्याने या भागात मोठ्या ट्राफिक जाम आहे.

अंधेरी पूर्व भागातील भिंत कोसळली; मातीच्या मलबाखाली एक व्यक्ती दबल्याची शक्यता. हा व्हिडिओ मोबाईल फोनमध्ये शूट करण्यात आला आहे. 

यंदा विकेंडला मंदावलेला पाऊस मुंबईत आज सकाळपासून पुन्हा बरसण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे रायगड, पालघर सह मुंबई आणि ठाण्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार बरसू शकतो असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबुरजवळ मोनो रेल्वे सेवादेखील विस्कळीत झाली आहे. सध्या मुंबई लोकलदेखील धीम्या गतीने सुरू आहे.  

मुंबई तील मुसळधार पावसामध्ये अंधेरी भागात घर कोसळलं

सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी सब वेमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

Load More

Mumbai Monsoon 8 July Updates: मुंबईमध्ये रविवारी विश्रांती घेतलेला पाऊस आज (8 जुलै) पासून पुन्हा कोसळायला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सकाळपासूनच दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी तुंबायला सुरूवात झाल्याने ठिकठिकाणी ट्राफिक आहे. तर मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था मंदावली असली तरीही तिन्ही मार्गावरील रेल्वे सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तास मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह, कोकण, नाशिक या भागातही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज आज संध्याकाळी 4.18 मिनिटांनी मुंबईमध्ये मोठी भरती आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी थोडा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक चाकरमान्यांना लेट मार्क लागण्याची शक्यता आहे. तर काहींनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.